AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : मातोश्रीने ‘त्या’ सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप, बांगलादेशीविरोधात राबवणार आक्रमक मोहीम

Nitesh Rane attack on Udhav Thackery : सैफ अली खान प्रकरणात पुन्हा बांगलादेशी कनेक्शन समोर आले. त्यावरून आता राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

Nitesh Rane : मातोश्रीने 'त्या' सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप, बांगलादेशीविरोधात राबवणार आक्रमक मोहीम
नितेश राणे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 19, 2025 | 2:19 PM
Share

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशातील असल्याचे समोर आल्याने आता राज्यात संतापाची लाट उसळली. त्यावरून राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी याच मुद्दावरून द्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी यावेळी बांगलादेशी घुसखोरांना इशारा दिला. बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहिम राबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मातोश्रीने हिरव्या सापांना दूध पाजले

यावेळी नितेश राणे यांनी मातोश्रीवर जोरदार प्रहार केला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत मिळवण्यासाठी, स्वतःच्या भावाला निवडून आणण्यासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं मतदान मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी मातोश्रीवर केला. इतक्या वर्षापासून उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. पण त्यांनी काहीच केले नाही. उलट मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात असा घणाघात त्यांनी केला.

या प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. कुणाच्या आशिर्वादाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं मुंबईत वास्तव्य वाढलं असा सवाल त्यांनी केला. ही घाण अगोदर त्यांनी साफ करावी असे आवाहन त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले. आमच्या सरकारवर बोलण्याअगोदर त्यांनी ही घाण साफ करावी असा घणाघात त्यांनी केला.

राणे बांगलादेशींविरोधात आक्रमक

राणे यांनी बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहीम राबवविणार असल्याचे सांगितले. जर ते नाव बदलून राहत असतील तर त्यांनी बोरा बिस्तरा गुंडाळावा आम्ही कोणालाही सोडणार नाही, नितेश राणे यांनी असा इशार बांगलादेशी घुसखोरांना दिला.

त्यांना भारताला इस्लामिक राष्ट्र

बांगलादेशी लोकांना भारत इस्लामिक राष्ट्र करायचे आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.भारतात त्यांना आधार कार्ड कागदपत्र देणार मोठं जाळ आहे. यात बडे मासे अडकणार आहेत तुम्ही बघा आता आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. बांगलादेशी मुसलमानान दूर करणे हे सगळ्याच काम असलं पाहिजे, असे ते म्हणाले. आता राजकारणात बांगलादेशींचा नवीन मुद्दा  तापण्याची आणि त्यावरून आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.