AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Platform Ticket : प्लॅटफॉर्म तिकीट दर 15 दिवसांसाठी वाढवले, कुठल्या स्थानकावर किती तिकीट? वाचा

9/5/2022 ते 23/5/2022 पर्यंत 15 दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली. त्यात CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर तिकीट दरात वाढ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

Platform Ticket : प्लॅटफॉर्म तिकीट दर 15 दिवसांसाठी वाढवले, कुठल्या स्थानकावर किती तिकीट? वाचा
प्लॅटफॉर्म तिकीट दर 15 दिवसांसाठी वाढवलेImage Credit source: google
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 08, 2022 | 7:57 PM
Share

मुंबई : मुंबईतील काही रेल्वे स्थानकात (Railway Station) प्लॅटफॉर्म तिकिटांची (Platform Ticket) किंमत 10 ते 50 रुपयापर्यंत तात्पुरती वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 9/5/2022 ते 23/5/2022 पर्यंत 15 दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली. त्यात CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर तिकीट दरात वाढ (Platform Ticket Rate) करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाईनची भूमिका बजावत असते. लाखो प्रवाशी रोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र अलिकडे अनेक गैरप्रकार वाढले होते. साखळी खेचून ट्रेन थांबवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच रेल्वे प्रवासावरील नियमांची मर्यादा हटवल्यानंतर लोकलमधील गर्दीही बरीच वाढली होती.

गैरप्रकार वाढल्याने निर्णय

कोरोनाकाळातही प्लॅटफॉमवरील गर्दी कमी ठेवण्याासाठी आणि कोरोनाला रोखण्यासाठी तिकीटात वाढ करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा कहर अटोक्यात आल्यानंतर पुन्हा या तिकीटांचं दर कमी करण्यात आले. मात्र आता पुन्हा काही गैरप्रकार वाढल्याने आणि आता पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्याने रेल्वेकडून तिकीटदर वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता तिकीट वाढवल्यानंतर तरी गर्दी नियंत्रणात राहणार का आणि होणारे गैरप्रकार थांबणार का? हेही पाहणं तेवढच महत्वाचं आहे. अनेकदा विनातिकीट प्लॅटफॉर्मवर अनेकजण घुसताता. आता त्यांना रोखण्याचेही आव्हान रेल्वेसमोर असणार आहे. ते आव्हान रेल्वे कसे पूर्ण करणार याकडेही प्रवाशांच्या नजरा लागल्या आहे.

तात्पुरती तिकीटदरवाढ

ही करण्यात आलेली तिकीट दरवाढ ही तात्पुरती असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा पंधरा दिवसांनंतर हे तिकीटदर कमी केले जाऊ शकतात. मात्र तरीही गैरप्रकार न थांबल्यास हे दर जैसे थेही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पंधरा दिवसांनी रेल्वे हे दर कमी करते का हे वाढवलेले दर तसेच ठेवते यावरही प्रवाशांचा खिसा अलंबून असणार आहे. सध्या तरी या वाढलेल्या दरांनी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एवढं मात्र नक्की. गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेचा या निर्णयाबाबत विचार सुरू होता. आता अखेर CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल या गर्दी होणाऱ्या आणि प्रवाशांची सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या स्थानकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात