AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापौर असताना किशोरी पेडणेकर यांनी किती खोके मातोश्रीवर पोहचविले? रवी राणा यांचा सवाल

किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहोचवले हे संपूर्ण जनतेला माहिती आहे.

महापौर असताना किशोरी पेडणेकर यांनी किती खोके मातोश्रीवर पोहचविले? रवी राणा यांचा सवाल
रवी राणा यांचा सवाल Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Oct 26, 2022 | 2:28 PM
Share

अमरावती : स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहारचे बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यातील वाद काही शमन्याची चिन्हे दिसत नाहीत. या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केल्यामुळं हा वाद काहीसा कमी झाल्याचे दिसत होतं. पण, या वादात आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ठाकरे यांनी उडी घेतली. आदित्य ठाकरे म्हणाले, दोन्ही आमदार हे खोक्यावरून भांडतात. आदित्य ठाकरे हे बच्चू कडू आणि रवी राणा यांना म्हणाले. यावर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिला. रवी राणा म्हणाले, माझा कोणाशी वाद नाही. मी सिद्धांताची लढाई लढतो. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेत “खोक्याचं” राजकारण सुरू केलं.

किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहोचवले हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. खोक्याशिवाय उद्धव ठाकरे यांचा पत्ता हलत नव्हता. खोक्याची प्रथा ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर बच्चू कडू यांच्याबाबात रवी राणा म्हणाले, कोण काय अल्टिमेटम देते, याकडे माझं लक्ष नसते. माझ्याविरोधात कोणी आंदोलन केलं याची मी पर्वा करत नाही. जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलवतील तेव्हा केव्हाही जाऊ.

माझे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. पण, मला विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा झालेत. अमरावती जिल्ह्यात ५५४ कोटी रुपये दिलेत. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी चांगली केली. आम्हाला गर्व आहे की, विदर्भाचा चांगला नेता राज्याच्या राजकारणात आहे.

फडणवीस यांच्यामुळं राज्याला न्याय मिळतो आहे. फडणवीस माझ्या सोबत आहेत. त्यामुळं कुणी कितीही आंदोलन केलं तरी मला काही फरक पडत नाही. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी अमरावती जिल्ह्यात जनतेची सेवा करण्याच संकल्प केलाय.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा