अमरावती : स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहारचे बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यातील वाद काही शमन्याची चिन्हे दिसत नाहीत. या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केल्यामुळं हा वाद काहीसा कमी झाल्याचे दिसत होतं. पण, या वादात आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ठाकरे यांनी उडी घेतली. आदित्य ठाकरे म्हणाले, दोन्ही आमदार हे खोक्यावरून भांडतात. आदित्य ठाकरे हे बच्चू कडू आणि रवी राणा यांना म्हणाले. यावर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिला. रवी राणा म्हणाले, माझा कोणाशी वाद नाही. मी सिद्धांताची लढाई लढतो. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेत “खोक्याचं” राजकारण सुरू केलं.