AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांनी कोणत्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात जावं?; प्रकाश आंबेडकर यांचा मित्रत्वाचा सल्ला काय?

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटात खलबतं सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने शिवसेना नेते, उपनेते, आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 1 वाजता मातोश्री येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोणत्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात जावं?; प्रकाश आंबेडकर यांचा मित्रत्वाचा सल्ला काय?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2023 | 12:05 PM
Share

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या विरोधात निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला बहाल केलं आहे. आयोगाने उद्धव ठाकरे यांनाच मूळ शिवसेनेपासून बेदखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या वादावर आपला निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्यच आहे. त्यांनी कोर्टात अपील केलं पाहिजे. निवडणूक आयोग चिन्ह किंवा पक्षाच्या झगड्यात निर्णय देणं अधिकारात येतं का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

त्या मुद्द्यावर कोर्टात जावं

मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

मातोश्रीवर बैठक

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटात खलबतं सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने शिवसेना नेते, उपनेते, आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 1 वाजता मातोश्री येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच उद्धव ठाकरे हे सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात अपील करतील असंही सांगितलं जात आहे.

निर्णय धक्कादायक

दरन्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुक आयोगाकडून निष्पक्ष निर्णय अपेक्षित होता. पण कालचा निर्णय धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शरद पवार यांची अतिशय सूचक प्रतिक्रिया आहे. चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर राष्ट्रवादीने नवीन चिन्हा सोबत निवडणुक लढवली, ताकद दाखवली. त्याच मार्गाने उद्धव ठाकरेना जावं लागेल. सर्वोच न्यायालयात ते जाणार आहेत.

तिथे त्यांना यश मिळालं तर चांगलच आहे. पण यश नाही मिळालं तर त्यांना नवीन पक्ष, नवीन चिन्हासोबत लोकांमध्ये जावं लागेल, असंही चव्हाण यांनी सांगितलं. महाविकास आघाडी अजूनही एकत्र असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...