AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन संसद भवनावर राज ठाकरे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ट्विट करत म्हटलं…

New parliament building inauguration : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सत्ताधारी विरोधक समोरासमोर आले असताना रविवारी उद्घाटन समारंभ पार पाडला. हा कार्यक्रम झाल्यानंतर नवीन संसद भवनासंदर्भात राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलीय.

नवीन संसद भवनावर राज ठाकरे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ट्विट करत म्हटलं...
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 28, 2023 | 3:56 PM
Share

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झाले. या समारंभात १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याची सुरुवात केली होती. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध केला. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे, असे ट्विट केले. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. मग राहुल गांधी यांच्यासोबत देशातील १९ पक्ष आले. परंतु सरकारच्या समर्थनार्थ २५ पक्ष आले आहे. या सर्व राजकीय चर्चांचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप समोर आली नव्हती. आता राज ठाकरे यांनी ट्विट करत मनसेची भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे

राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.

किती जणांचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या समारंभास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवले नाही. यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह 19 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदनही काढले आहे. परंतु आता सरकारच्या समर्थनार्थ 25 पक्ष आले आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये फुट पडली आहे. हे सर्व पक्ष उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहे. यामध्ये एनडीएमधील पक्षांसोबत इतर पक्षही आहेत.

हे ही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन अन् शाहरुख खान, अक्षयकुमार, अनुपम खेर आले पुढे…

862 कोटी रुपयांचा खर्च झालेला नवीन संसद भवन तयार, कोण आहे आर्किटेक्ट बिमल पटेल

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?