AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check: राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake? विधान परिषदेवरच्या नियुक्तीतले ती सहा नावं कोणती?

Fact Check: राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. तब्बल वर्षभरानंतर राज्यापालांनीच सहा सदस्यांची नावे सूचवली आहेत.

Fact Check: राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake? विधान परिषदेवरच्या नियुक्तीतले ती सहा नावं कोणती?
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई: राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. तब्बल वर्षभरानंतर राज्यापालांनीच सहा सदस्यांची नावे सूचवली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून ही नावं सूचवली आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना जी नावे सूचवली आहेत. ते सर्वजण सामाजिक क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे वर्षभरानंतर राज्यपालांकडून 12 सदस्यांच्या नियुक्तीवर राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या (maharashtra) इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची वर्णी लावण्यासाठी स्वत:हून सहा नावे सूचवल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारं हे पत्रं बनावट असल्याचं म्हटलं जात आहे. राजभवनातून या पत्राबाबतचा खुलासा करण्यात आला असून हे पत्रं बनावट असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कोणतीही नाव सूचवली नाही. ते पत्रं फेक आहे, असं राजभवनाने म्हटलं आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयातून त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पत्रात नेमकं काय?

राज्यपाल कोश्यारी यांचं पत्र अचानक व्हायरल झालं. 12 आमदारांच्या नियुक्तीपूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात राज्यापालांनी सहा सदस्यांच्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडी बाबतचं हे पत्रं आहे. महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी ही नावे घ्यावीत असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील या सदस्यांचं योगदान पाहून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या सहमतीने सदर नावाचा प्रस्ताव सादर करावा, असं पत्रात म्हटलं आहे.

कोणत्या सदस्यांची नावं सूचवली

वीरभद्रेश करबसप्पा बसवंती. (सामाजिक)

रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) (राजकीय)

सतीश रामचंद्र घरत (उद्योग )

संतोष अशोक नाथ, (सामाजिक)

मोरेश्वर महादू भोंडवे. (राजकीय)

जगन्नाथ शिवाजी पाटील. (सामाजिक)

ते पत्रं बनावटच

दरम्यान, राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारं हे पत्रं बनावट असल्याचं उघड झालं आहे. खुद्द राजभवनातून असं कोणतंही पत्रं राज्यपालांना पाठवलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यपालांनी कधीही मुख्यमंत्र्यांना असं पत्रं लिहिलेलं नाही. हे पत्रं म्हणजे कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. या पत्रात काही तथ्य नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर पालघरमध्ये मनसैनिक आक्रमक

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

Marathwada : 3 लाख क्विंटल हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण..!

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.