AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करू नका; आठवलेंनी ठाकरे सरकारला डिवचले

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील ठाकरे सरकारला डिवचले आहे. (ramdas athawale slams maha vikas aghadi over remdesivir shortage)

रेमडेसिवीरचा 'गेम'डीसिवीर करू नका; आठवलेंनी ठाकरे सरकारला डिवचले
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
| Updated on: Apr 19, 2021 | 11:19 AM
Share

मुंबई: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील ठाकरे सरकारला डिवचले आहे. रेमडेसिवीरचा गेमडेसिवीर करू नका, असा टोला रामदास आठवले यांनी आघाडी सरकारला लगावला आहे. (ramdas athawale slams maha vikas aghadi over remdesivir shortage)

रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

आरोपांचं राजकारण करू नका

कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये असे आवाहनही त्यांनी केलं.

खोडसाळ आरोप करू नये

कोरोनाच्या महामारीमुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा खोटा आणि खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसिवरसह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आवाहनही त्यांनी केलं.

रोज फोन येत आहेत

मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत. रुग्णांना बेड मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असंही ते म्हणाले. (ramdas athawale slams maha vikas aghadi over remdesivir shortage)

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती; तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा: संजय राऊत

Corona Cases and Lockdown News LIVE : औरंगाबादेत 30 एप्रिलनंतर लस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांवर होणार दंडात्मक कारवाई

LIVE | परीक्षेशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन करणं अशक्य, बोर्डाच्या माजी अध्यक्षांच मतं

(ramdas athawale slams maha vikas aghadi over remdesivir shortage)

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.