AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे उद्धव ठाकरेंनी केलं, ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?; राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Sanjay Raut on CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

जे उद्धव ठाकरेंनी केलं, ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?; राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
संजय राऊत, खासदार
| Updated on: Sep 17, 2024 | 1:40 PM
Share

आगामी विधानसभा निवडणुकीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. महायुती आम्हाला चर्चा करायची गरज नाही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे. जेव्हा आश्रित असतात तेव्हा त्यांना आवाजत नाही. भाजपबरोबर स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना आणि प्रसंगी लाथ मारून उद्धव ठाकरे, आम्ही बाहेर पडलो. अशी हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही. ही शिवसेनेमध्ये होती. आम्ही बाहेर पडलो. भाजपमध्ये दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळ जे आहे. जे काही त्यांच्यासमोर ते येतील तुकडे ते त्यांना स्वीकारावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

स्वाभिमान अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काय मिळते ते गप्प पणे घ्या ही भारतीय पक्षाची भूमिका राहील. स्ट्राईक रेट काय असतो हा स्ट्राइक रेट भाजप आणि मोदी शाहांमुळे झाला. मोदी शाहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि चिन्ह कायद्याने मिळालं नसतं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे

मविआचं जागावाटप कधी?

पैसा आणि यंत्रणा हा सर्व महायुतीचा स्ट्राईक रेट आहे. शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राईक रेटची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी. मग स्ट्राइक रेट जरूर दाखवावा. आमच्यामध्ये स्ट्राईक रेट हा विषय कुठेच येत नाही. जागावाटप संदर्भात उद्यापासून आमची चर्चा सुरू होईल. 18 ,19, आणि 20 या तारखेला आम्ही तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसणार आहोत आणि त्यातून जो फॉर्मुला येईल कोणी कुठून लढायचे तो अंतिम राहील. जिंकेल त्याची जागा हीच पक्षाची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊतांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा… नरेंद्र मोदींच्या काळात देश पुढे वाढत असेल तर किती फुट किती मीटर वाढला ते आम्हाला बघावे लागेल. आम्हाला एवढेच माहित आहे की चायना पुढे वाढत आहे ते देखील मोदी यांच्या कार्यकाळात वाढत आहे. मणिपूर हातातून जात आहे. खासदार आणि आमदार विकत घेत आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.