AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?

हाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं?

तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?
तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 02, 2023 | 11:45 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भाजपने ‘मिशन 145’ सुरू केलं आहे. भाजपच्या या ‘मिशन 145’चं रणशिंग फुंकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत. त्यामुळे जेपी नड्डा यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या या मिशनची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या मिशनची खिल्ली उडवली आहे. भाजप जर ‘मिशन 145’ सुरू करत आहे. तर शिंदे गटाला काय धुणीभांडी करायला ठेवणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

भाजपचे जर ‘मिशन 145’ असेल तर त्यात शिंदे गट कुठे आहे? भाजपचे ‘मिशन 145’ असेल तर शिंदे गटाच्या लोकांना धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भाजपच्या पायरीवरही यांना कोणी उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणा. ते धर्मवीर नव्हते असं विधान केलं आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर बोलण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. याबाबत मला अभ्यास करावा लागेल, असं राऊत म्हणाले.

मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचं संभाजी नगर नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या सरकारमध्ये त्या प्रस्तावाचं काय झालं? असा सवाल राऊत यांनी केला.

महाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? त्यांचं भाषण ऐका. हे गल्लीतलं भाषण आहे. उखाळ्यापाखाळ्या काढण्याचं. त्यांना एक संधी मिळाली आहे. भले ती बेकायदेशीर मिळाळी असेल. पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संयमाने बोलायला हवं, असा चिमटा त्यांनी काढला.

विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलत आहात. कोणी मंत्री म्हणून बोलत असतो, तर कोणी विरोधी पक्षनेता म्हणून बोलत असेल तर त्यांनी कायद्याचं भान ठेवून बोललं पाहिजे. लोकांच्या समस्यांवर बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.