AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?

हाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं?

तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?
तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 02, 2023 | 11:45 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भाजपने ‘मिशन 145’ सुरू केलं आहे. भाजपच्या या ‘मिशन 145’चं रणशिंग फुंकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत. त्यामुळे जेपी नड्डा यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या या मिशनची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या मिशनची खिल्ली उडवली आहे. भाजप जर ‘मिशन 145’ सुरू करत आहे. तर शिंदे गटाला काय धुणीभांडी करायला ठेवणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

भाजपचे जर ‘मिशन 145’ असेल तर त्यात शिंदे गट कुठे आहे? भाजपचे ‘मिशन 145’ असेल तर शिंदे गटाच्या लोकांना धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भाजपच्या पायरीवरही यांना कोणी उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणा. ते धर्मवीर नव्हते असं विधान केलं आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर बोलण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. याबाबत मला अभ्यास करावा लागेल, असं राऊत म्हणाले.

मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचं संभाजी नगर नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या सरकारमध्ये त्या प्रस्तावाचं काय झालं? असा सवाल राऊत यांनी केला.

महाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? त्यांचं भाषण ऐका. हे गल्लीतलं भाषण आहे. उखाळ्यापाखाळ्या काढण्याचं. त्यांना एक संधी मिळाली आहे. भले ती बेकायदेशीर मिळाळी असेल. पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संयमाने बोलायला हवं, असा चिमटा त्यांनी काढला.

विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलत आहात. कोणी मंत्री म्हणून बोलत असतो, तर कोणी विरोधी पक्षनेता म्हणून बोलत असेल तर त्यांनी कायद्याचं भान ठेवून बोललं पाहिजे. लोकांच्या समस्यांवर बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.