AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले 6 मुद्दे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले 6 मुद्दे
| Updated on: Aug 20, 2019 | 5:41 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. पवारांनी (Sharad Pawar) पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील कराडमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची घरं पडली आहेत, शेती उद्ध्वस्त झाली आहे. शरद पवारांनी स्वत: या भागात जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पवारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती दिली.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले मुद्दे

  1. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यामध्ये सोयाबीन, ऊस, भाजीपाला यांचा समावेश आहे.
  2. ऊसाच्या उंचीच्या वर पाणी असल्याने त्याचे नुकसान झाले आहे. अनेक क्षेत्रातील ऊस कुजण्याची शक्यता आहे. यात सरकारने  कर्जमाफी  करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र यात वाढ करुन 1 लाख रुपयाचे साहाय्य सरकारने द्यावे.
  3. पूरग्रस्त भागातील जमिनीला भेगा गेल्या असून हे नीट करण्याकडे आपण लक्ष घालावे.
  4. घरांचेदेखील नुकसान मोठे झाले आहे. यात गोरगरीब मागासवर्गीयांची घरे मातीची असल्याने ती बांधण्याचा कार्यक्रम असा घ्यावा जो टिकाऊ राहील.
  5. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेले आहे. यासंबंधीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. याशिवाय गावातील मुलभूत गोष्टींचा विचार करावा.
  6. सातारा, सांगली, कोल्हापूरसह  कोकण आणि पालघर जिल्ह्यातदेखील अनेक नुकसन झाले. याकडे आपण आचारसंहिता जाहीर होण्याआधी उपाययोजना करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

पूरग्रस्तांचं पीककर्ज माफ

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. यानुसार पूरग्रस्तांचं 1 हेक्टरवरील पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. शिवाय पडलेली घरं बांधून देण्यात येणार आहेत. बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत, तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये, घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार, कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य, छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई, अशी मदत देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या  

पूरग्रस्तांचं कर्ज माफ, 36 हजार घर भाडं, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा 

शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, पूरग्रस्तांच्या मदतीची आयडिया देणार  

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.