AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आतापर्यंत ‘मातोश्री’ कुठल्या खोक्यावर चालत होती, ते…’, शिंदे गटाच्या महिला नेत्याचा सर्वात मोठा इशारा

खोक्यांच्या आरोपांवरुन शिंदे गटाच्या एका महिला प्रवक्त्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा इशारा दिलाय.

आतापर्यंत 'मातोश्री' कुठल्या खोक्यावर चालत होती, ते...', शिंदे गटाच्या महिला नेत्याचा सर्वात मोठा इशारा
Image Credit source: social media
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 17, 2022 | 5:02 PM
Share

सुमेध साळवे, मुंबई : महाविकास आघाडीकडून आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केलं. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या या मोर्चावर आता शिंदे गटाकडून खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सडकून टीका केलीय. विशेष म्हणजे खोक्यांच्या आरोपांवरुन शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा इशारा दिलाय.

“अगदी फ्रीजच्या खोक्यातून ‘मातोश्री’वर पोहोचत होते त्याबद्दल काय म्हणावं? आतापर्यंत’मातोश्री’ कुठल्या खोक्यावर चालत होती यावर आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही तीन स्टॅंडिंग चेअरमन आहोत. बोलायला लावू नका”, असा इशारा शीतल म्हात्रे यांनी दिला.

“खासदार संजय राऊत ज्योतिषी झालेले आहेत. महाविकास आघाडीतले ते पाळीव आहेत. उद्ध्वस्त सेनेला मुंबई महानगरपालिका हातातून निघून जाईल, याची भीती वाटतेय”, अशी खोचक टीका शीतल म्हात्रे यांनी दिली.

“मोर्चामध्ये सुषमा अंधारे कुठे होत्या? त्या दिसल्या नाहीत”, असंदेखील शीतल म्हात्रे म्हणाल्या.

“या वसुली सरकारला सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर काहीही काम नाहीय. त्यामुळे काहीही वेगवेगळे विधान करत आहेत. स्वतःच्या जीवावर आपण मोर्चा करू शकत नाही, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना सोबत घेतलं”, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

“तुम्ही महापुरुष म्हणतात, मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला तेव्हा कोणीच भाष्य केलं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर महापुरुष नाहीत का?”, असा सवाल त्यांनी केला.

“काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना बुके देताना किंवा राहुल गांधी यांच्यासोबत चालताना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला तुम्ही पुष्पहार केले, मात्र गांधी घराण्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घातलाय?”, असा प्रश्न त्यांनी ठाकरे गटाला उद्देशून उपस्थित केला.

“महाविकास आघाडीमधील नेत्ंयाची मानसिकता ही खचलेली आहे. आता त्यांची फक्त प्रॅक्टिकली मानसिकता थकायची बाकी राहिलीय”, अशी खोचक टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

Follow Us
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?