AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्रात भविष्यात दोनच नेते राहतील’, संजय राऊत यांचा सर्वात मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.

'महाराष्ट्रात भविष्यात दोनच नेते राहतील', संजय राऊत यांचा सर्वात मोठा दावा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 15, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भविष्यात फक्त दोन नेते राहतील, असा मोठा दावा केला आहे. “मी शरद पवार यांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसले तरी 2024 च्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. काही कौटुंबिक गोष्टी असतात, संस्थात्मक गोष्टी असतात. दोघांचं देखील मैदान बारामती आहे. पण बारामती शरद पवारच मारतील. महाराष्ट्रात देखील शरद पवारच असतील”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“या महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहतील, जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच नेत्यांचे राजकारण होतं. शरद पवार आज पुन्हा एकदा संकटातून उभे राहत आहेत, नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘उद्धव ठाकरे दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील’

“उद्धव ठाकरे दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील. शिवसेनेच्या सर्व नेत्यांवर महाराष्ट्रातल्या विविध विभागांच्या संघटनात्मक बाजूची जबाबदारी देण्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये विभागीय नेते होते. त्या-त्या विभागाच्या संघटनात्मक बांधणीच्या जबाबदाऱ्या होत्या. जे नवीन नेते निर्माण झालेले आहेत, त्यातील प्रमुख नेत्यांसह इतर प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची घोषणा लवकरच एक ते दोन दिवसात आपल्यासमोर येईल”, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

“गेल्या वर्षीचा काळ जरी खडतर असला, माझी गेल्या वर्षीची दिवाळी तुरुंगात असली, तरी दिवस हे बदलत असतात. काळ खडतर आला म्हणून गुडघे टेकून रडत बसणं हे आमच्या रक्तात नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे, तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे खडतर काळ असतो तो आपल्याला टोचत नाही. काही लोक काळ आला की पळून जातात. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच्या लोकांबरोबर तुम्ही पाहिलं असेल. आम्ही सदैव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.

’56 इंच छातीचा नेता आज राहुल गांधींना घाबरतो’

“काँग्रेस नेते राहुल गांधी काय आहेत आणि भविष्यात ते कोठे जाणार आहेत याचे चित्र स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा 56 इंच छातीचा नेता आज राहुल गांधींना घाबरतो. राहुल गांधींवर सातत्याने बोलतो, त्यांच्यावर चर्चा करतो, हेच राहुल गांधी यांचं यश आहे. राहुल गांधी मूर्खांचे सरदार आहेत तर बोलता कशाला? त्यांना मिळणाऱ्या पाठिंबाविषयी भय आहे म्हणून तुम्हाला जयश्री राहुल गांधी दिसतात. ही चांगली गोष्ट आहे तुम्ही काँग्रेसमुक्त करू शकला नाहीत. काँग्रेस तुमच्या बोकांडी बसली आहे. शिवसेना तुम्ही संपवली नाही. उलट शिवसेना जोमाने उभे राहिली. कोत्याही पक्षाला मुक्त करून या देशांमध्ये लोकशाही टिकणार नाही, या मताचे आम्ही आहोत. उद्या सत्तेवर आलो तर आम्ही असं म्हणणार नाही. भाजपमुक्त देश आम्हाला करायचा आहे. आम्ही त्यांना आरसा दाखवणार”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?