AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्रात भविष्यात दोनच नेते राहतील’, संजय राऊत यांचा सर्वात मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.

'महाराष्ट्रात भविष्यात दोनच नेते राहतील', संजय राऊत यांचा सर्वात मोठा दावा
| Updated on: Nov 15, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भविष्यात फक्त दोन नेते राहतील, असा मोठा दावा केला आहे. “मी शरद पवार यांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसले तरी 2024 च्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. काही कौटुंबिक गोष्टी असतात, संस्थात्मक गोष्टी असतात. दोघांचं देखील मैदान बारामती आहे. पण बारामती शरद पवारच मारतील. महाराष्ट्रात देखील शरद पवारच असतील”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“या महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहतील, जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच नेत्यांचे राजकारण होतं. शरद पवार आज पुन्हा एकदा संकटातून उभे राहत आहेत, नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘उद्धव ठाकरे दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील’

“उद्धव ठाकरे दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील. शिवसेनेच्या सर्व नेत्यांवर महाराष्ट्रातल्या विविध विभागांच्या संघटनात्मक बाजूची जबाबदारी देण्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये विभागीय नेते होते. त्या-त्या विभागाच्या संघटनात्मक बांधणीच्या जबाबदाऱ्या होत्या. जे नवीन नेते निर्माण झालेले आहेत, त्यातील प्रमुख नेत्यांसह इतर प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची घोषणा लवकरच एक ते दोन दिवसात आपल्यासमोर येईल”, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

“गेल्या वर्षीचा काळ जरी खडतर असला, माझी गेल्या वर्षीची दिवाळी तुरुंगात असली, तरी दिवस हे बदलत असतात. काळ खडतर आला म्हणून गुडघे टेकून रडत बसणं हे आमच्या रक्तात नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे, तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे खडतर काळ असतो तो आपल्याला टोचत नाही. काही लोक काळ आला की पळून जातात. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच्या लोकांबरोबर तुम्ही पाहिलं असेल. आम्ही सदैव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.

’56 इंच छातीचा नेता आज राहुल गांधींना घाबरतो’

“काँग्रेस नेते राहुल गांधी काय आहेत आणि भविष्यात ते कोठे जाणार आहेत याचे चित्र स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा 56 इंच छातीचा नेता आज राहुल गांधींना घाबरतो. राहुल गांधींवर सातत्याने बोलतो, त्यांच्यावर चर्चा करतो, हेच राहुल गांधी यांचं यश आहे. राहुल गांधी मूर्खांचे सरदार आहेत तर बोलता कशाला? त्यांना मिळणाऱ्या पाठिंबाविषयी भय आहे म्हणून तुम्हाला जयश्री राहुल गांधी दिसतात. ही चांगली गोष्ट आहे तुम्ही काँग्रेसमुक्त करू शकला नाहीत. काँग्रेस तुमच्या बोकांडी बसली आहे. शिवसेना तुम्ही संपवली नाही. उलट शिवसेना जोमाने उभे राहिली. कोत्याही पक्षाला मुक्त करून या देशांमध्ये लोकशाही टिकणार नाही, या मताचे आम्ही आहोत. उद्या सत्तेवर आलो तर आम्ही असं म्हणणार नाही. भाजपमुक्त देश आम्हाला करायचा आहे. आम्ही त्यांना आरसा दाखवणार”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.