AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंडमळा पुलासाठी आठ कोटी मंजूर, सही ८० हजाराच्या पत्रावर…, संजय राऊत यांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहे. त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार आला आहे. आता ते कुंडमळा दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

कुंडमळा पुलासाठी आठ कोटी मंजूर, सही ८० हजाराच्या पत्रावर..., संजय राऊत यांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप
sanjay raut PCImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 16, 2025 | 11:26 AM
Share

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो की इंद्रायणी नदीवरील पूल हे भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. या दोन्ही दुर्देवी घटना केवळ भ्रष्टाचारामुळे घडल्या आहेत. इंद्रायणी नदीवरील पुलासाठी आणि कुंडमळा जोड रस्त्याच्या कामांना ११ जुलै २०२४ रोजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली. या कामासाठी १५ कोटींचा निधी मागितला होता. पण आठ कोटी रुपये मंजूर झाले आणि ८० हजारांच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी सही केली. हे पत्र भाजपच्या पदाधिकाऱ्यास दिले, असा आरोप शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, कुंडमळा घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार गप्प बसले आहेत. त्या भागातील त्याचे आमदार सुनील शेळकेही बोलत नाही. ते सर्व आहेत कुठे? अजित पवार यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, चौकशीचे आदेश दिले आहेत. खरे म्हणजे त्यांचीच चौकशी केली पाहिजे. कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचा विषय असो की कुंडमळा येथील घटना ज्या ज्या ठिकाणी दुर्देवी प्रकार घडत आहेत, त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचे नाव येत आहे, असे राऊत यांनी म्हटले.

पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथील पूल कोसळला. त्यात किती लोकांचा मृत्यू झाले, त्याचा खरा आकडा आला नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, विकासाच्या गोष्टी करणाऱ्यांना माझा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहे. त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार आला आहे. आता ते त्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आहेत. त्यांना घेऊन ते सतत फिरत असतात. परंतु एक, दोन कोटींचा पूल अनेक वर्षांत पालकमंत्री उभे करु शकले नाही. पालकमंत्री मेट्रोची कामे, बिल्डराची कामे करत असतात. कुंडमळा येथील घटनेस जबाबदार कोण? हे अजित पवार यांनी सांगितले पाहिजे. त्या पुलास पैसे मंजूर झाले. मग मंजूर झालेले पैसे गेले कुठे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. त्यानंतर तो कोसळला होता. त्यानंतर महिन्याभरापूर्वी नवीन पुतळा बसवला. त्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. त्या ठिकाणी माती खचली आहे. गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा समुद्रात आहे. त्या पुतळ्यास ६० वर्ष झाला आहे. ते सर्व पुतळे सुरक्षित आहे. कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत