AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटातील पाच मंत्र्यांची एसआयटी चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. त्याचे सोहळे भाजकडून साजरे केले जात आहे. परंतु त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील वस्तूंना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला नाही का? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिंदे गटातील पाच मंत्र्यांची एसआयटी चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी
संजय राऊत
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 13, 2025 | 10:47 AM
Share

शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पाच मंत्र्यांची एसआयटी चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी करा, त्यामध्ये संजय राठोड, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, उदय सामंत यांच्यासह पाच जणांची नावे आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट यांचा व्हिडिओ मार्फ केला आहे, असा आरोप ते करत आहेत, त्यासंदर्भात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येणार आहे. त्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, तो व्हिडिओ मार्फ केला की काय केले, ते फॉरेन्सिक लॅब ठरवणार आहे. त्यासंदर्भात विधानसभेत वक्तव्य येऊ द्या, असे त्यांनी म्हटले.

राऊत यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. त्याचे सोहळे भाजकडून साजरे केले जात आहे. परंतु त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील वस्तूंना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला नाही का? तुम्ही ते किल्ले बांधले आहेत का? यासंदर्भात राजकारण करु नका, असे संजय राऊत यांनी भाजपला म्हटले आहे.

धारावीच्या माध्यमातून भूखंड घोटाळा

मुंबई लुटली जात आहे. मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार केले जात आहे. मराठी माणसाला येथून हाकलले जात आहे. मुंबई तोडण्याचे कारस्थान आहे. धारावी त्याचे उदाहरण आहे. आज उद्धव ठाकरे असते तर त्यांनी धारवीतील प्रकल्पाला स्थगिती दिली असती. त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. धारावीच्या निमित्ताने मुंबईत भूखंड घोटाळा झाला आहे. भ्रष्टाचारास मुक्त रान देणारे जे जे प्रकल्प होते, त्यालाही आम्ही स्थगिती दिली असती. शक्तीपीठ महामार्गालाही आम्ही स्थगिती दिली असती. हा रस्ता अदानी यांच्यासाठी तयार होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळालाही आम्ही स्थगिती दिली असती. कारण हे सर्व प्रकल्प अदानी यांच्यासाठी केले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत