AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील महिला बालकल्याण विभागाचे काम उत्कृष्ट : स्मृती इराणी

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या काम उल्लेखनीय असल्याचे म्हणत कौतुक केले. तसेच कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही राज्याचे उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या.

महाराष्ट्रातील महिला बालकल्याण विभागाचे काम उत्कृष्ट : स्मृती इराणी
| Updated on: Jul 29, 2019 | 6:58 PM
Share

मुंबई : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या काम उल्लेखनीय असल्याचे म्हणत कौतुक केले. तसेच कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही राज्याचे उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेत महिला व बालकल्याण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इराणी यांना राज्यातील कामाची माहिती दिली. राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागात केंद्रांच्या योजनांसोबतच महिला व बालकल्याणातील कुपोषणमुक्ती आणि आरोग्याशी संबंधित योजना आणखी सक्षमपणे राबवू असेही आश्वासन फडणवीस यांनी इराणी यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कुपोषण मुक्ती आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात राज्यातील यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. यामुळे कुपोषणमुक्तीसह बाल मृत्यदर कमी करण्यात यश आले आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या यंत्रणेनेही नागरी भागात विशेषत्वाने काम करण्याची गरज आहे. नागरी भागात या योजना आणखी सक्षम राबवल्यास आणखी प्रभावी कामगिरी करता येईल.’

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, “महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. राज्यात कुपोषण मुक्ती, माता व बाल आरोग्य यात उत्कृष्टपणे काम सुरू आहे. ‘माँ’ या पोषण अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील, असा विश्वास वाटतो.’

यावेळी स्मार्ट अंगणवाडी, माता-बाल लसीकरण, पोक्सो अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया व कार्यवाही, बाल मृत्युदर रोखण्यासाठीच्या विविध उपाय योजना, जाणीव-जागृतीचे उपक्रम, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आधाराश्रमांची उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली.

याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव पवनार, प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो, अजय खेरा आदी उपस्थित होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.