AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजपने अन्य पक्षातून स्वतः मध्ये आलेल्याना भुंकायला सांगू नये”; टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

भाजपची चिंता करू नये, राष्ट्रवादी बघा कुठे चालली आहे पार्टी विसर्जित करावी लागते आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

भाजपने अन्य पक्षातून स्वतः मध्ये आलेल्याना भुंकायला सांगू नये; टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
| Updated on: Jan 28, 2023 | 5:30 PM
Share

मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून शिंदे गट आणि मविआच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी वाढल्या आहेत. त्यातच आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राष्ट्रवादीचे तीन खासदार राहिले तरी बरं, स्वतःच्या पक्षाची लायकी काय ते बघावं आधी, आम्ही 400 ची गोष्ट करतोय आणि ते अजून 4 वरच आहेत.

त्यामुळे यांनी भाजपची चिंता करू नये, राष्ट्रवादी बघा कुठे चालली आहे पार्टी विसर्जित करावी लागते आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तर त्याच वेळी सदाभाऊ खोत यांनीही शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर ती टोळी आहे.

आणि त्या टोळीचे शरद पवार हे गब्बरसिंह असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी पलटवार करत या दोन नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

जशी सरड्याची उडी कुंपणापर्यंत असते तशीच यांची फक्त बारामतीपर्यंत उडी आहे अशी टीका चित्रा वाघ यांच्यावर विद्या चव्हाण यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि राष्ट्रावादीतील नेत्यांवर भाजपकडून आणि शिंदे गटाकडून टीकासत्र चालूच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रतिहल्ला चढविण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही विद्या चव्हाण यांनी हल्लाबोल चढविला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसला टोळी म्हणणारे हे बाहरचे लोकं आहेत. ती लोकं भाजपची नाहीत असंही विद्याताई चव्हाण यांच्याकडून स्पष्ट केले गेले आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे हे भाजपचे नाहीत जी नेते बाहेरच्या पक्षातून आले आहेत. त्यांच्याकडूनच ही टीका केली जात आहे.

त्यामुळे भाजप पक्षात बाहेरील पक्षातून आलेल्या नेत्यांवर विद्याताई चव्हाण यांनी टीका केली आहे. ज्या भाजपच्या नेत्यानी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. ज्या नेत्याकडून राष्ट्रवादी किंवा पवार यांना नाव ठेवण्यापेक्षा एकदा महागाई किंवा बेरोजगारीवर त्यांनी बोलावं असा जोरदार प्रतिहल्ला सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आला आहे.

भाजपचे समर्थन करणारे आणि भाजपमधील चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर आणि भाजपचे मित्र पक्षातील सदाभाऊ खोत यांच्याकडून वारंवार शरद पवार यांच्यावर टीका केली जाते.

त्यावर विद्या चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, जशी सरड्याची उडी कुंपणापर्यंत तशी यांची फक्त बारामतीपर्यंत उडी जाते. त्यामुळे भाजपने अन्य पक्षातून स्वतः मध्ये आलेल्याना भुंकायला सांगू नये असा प्रतिहल्ला विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी केला आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.