AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदी भाषिक मते मिळवण्यासाठीच योगी यांच्या रोड शोचा ‘उद्योग’; ‘सामना’तून हल्लाबोल

योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे. तेव्हाही त्यांना इंधन लागणार आहे, असे सूचक संकेतही सामनातून देण्यात आल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.

हिंदी भाषिक मते मिळवण्यासाठीच योगी यांच्या रोड शोचा 'उद्योग'; 'सामना'तून हल्लाबोल
हिंदी भाषिक मते मिळवण्यासाठीच योगी यांच्या रोड शोचा 'उद्योग'; 'सामना'तून हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 06, 2023 | 7:40 AM
Share

मुंबई: उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी हॉटेल ताज समोर रोड शो केला. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना रोड शो करण्याची गरजच काय? असा सवाल करतानाच राज्यातील फुटकळ नेत्यांचा सल्ल्याने वागून योगींनी स्वत:ची अप्रतिष्ठा करून घेऊ नये. तसेच उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे, असा आरोप दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. तसेच भाजपवरही टीका करण्यात आली आहे. या शिवाय गुजरातमध्ये महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेरलं आहे. मुंबईतील योगींचा रोड शो हा भाजप पुरस्कृत राजकीय खेळ आहे, असा आरोपच सामनातून करण्यात आला आहे.

राज्यातील रोजगार बुडाल्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राचे अडीच लाख कोटी गुंतवणुकीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. राज्यातील रोजगार गुजरातला वळवण्यात आल्यानेच हे घडल्याचा दावा करतानाच मुंबई बाबत लंगडतोड सुरू आहे.

तरीही आम्ही योगींचं मुंबईत स्वागत करतो. मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकास इंजिनाची गती वाढते आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा, असा सल्लाही सामनातून योगींना देण्यात आला आहे. या शिवाय योगी हे भगव्या वस्त्रातील सत्पुरुष असून त्यांच्या एक राजकारणी दडला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे. तेव्हाही त्यांना इंधन लागणार आहे, असे सूचक संकेतही सामनातून देण्यात आल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ महाराज वरचेवर मुंबईत येत असतात. त्यात गैर काहीच नाही. पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

या रोड शोवरही ‘सामना’तून सवाल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा रोड शो झाला काय? त्यावर किती दौलतजादा खर्च झाली? या रोड शोमध्ये किती आणि कोणते उद्योगपती सामील होते? असा सवालही करण्यात आले आहेत.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर