AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा छेडला; शपथ घेऊन एकनाथ शिंदे आव्हान दिलं..

निधी वाटपाबाबत हे सरकार नेमकं काय करतं आहे तेही यावरून कळेल असा टोलाही त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा छेडला; शपथ घेऊन एकनाथ शिंदे आव्हान दिलं..
| Updated on: Mar 13, 2023 | 4:29 PM
Share

गोरेगाव : ज्या गद्दार आमदारांनी शिवसेनेबरोबर ज्या गद्दारांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बंडखोरी केली त्यांनी हिंदुत्वाचा खरा अर्थ तरी माहिती आहे का असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी गोरेगावमधील सभेत केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेपासून ते अगदी आताच्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आताच्या अर्थसंकल्पामध्ये 40 गद्दार आमदारांना किती निधी मिळाला यावर नजर टाकली तर या सरकारचे धोरण तुम्हाला लक्षात येईल. मात्र सरकारच्या या धोरणामुळे लोकशाही धोक्यात येत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

निधी वाटपाबाबत हे सरकार नेमकं काय करतं आहे तेही यावरून कळेल असा टोलाही त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

या सरकारमधील जे 40 गद्दार आमदार सांगत आहेत की, हिंदुत्वासाठी म्हणून आम्ही महाविकास आघआडीतून बाहेर पडलो. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले होते म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडलो असल्याचे सांगितले ते हिंदु्त्व खोटं असल्याचा हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केलाआहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी ज्यावेळी उद्धव ठाकरे आयोध्येला गेले होते. त्यावेळी तुम्ही सोबत होता मग तुम्ही बंद डोळ्यांनी त्यांच्यासोबत गेला होता का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही आणि त्या पदावर नसतानाही ते आयोध्येला गेले होते. त्यावेळी तुम्हाला त्यांचे हिंदुत्व का दिसले नाही असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांनाही केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असतानाही राष्ट्रवादीला स्पष्टपणे सांगितले होते, की आमचं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे.

आमचं हिंदुत्व हे खा आणि ते खाऊ नका असंही कुणी सांगत नाही. आमचं हिंदुत्व कुणाला जाळण्याचं हिंदुत्व नाही आहे आमचं हिंदुत्व हे धर्माधर्मातील वाद निर्माण करण्यातील नाही.

आमतं हिंदुत्व हे सर्वाना सोबत घेऊन जाणारं असल्याचे सांगित हिंदुत्वावरून त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सगळ्यांचं रक्त हे लालच असते आणि ते सोबत घेऊन जाणारंच आहे त्यामुळे आमचं हिंदुत्व हे भेदभाव निर्माण करणारं हिंदुत्व नाही तर सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी शिंदे-फडणवीस यांना ठणकाऊन सांगितले.

आमचं हिंदुत्व हे महाराष्ट्राला आणि देशाला पुढं घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. त्यामुळे हे गद्दार आमदार जे हिंदत्व सांगत आहेत, त्या हिंदुत्वामुळे ही लोकशाही धोक्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.