AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारची मंजुरी, पाहा Video

देशात एकत्रच निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारनं हालचाली सुरु केल्यात. वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला कॅबिनेटनं मंजुरी दिलीय मात्र आता खरी परीक्षा विधेयक पास करण्यात असेल, कारण 2 तृतियांश एवढं बहुमत केंद्र सरकारकडे नाही.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारची मंजुरी, पाहा Video
| Updated on: Sep 18, 2024 | 10:26 PM
Share

वन नेशन, वन इलेक्शन अर्थात लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्यासाठी मोदी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीचा अहवाल मंजूर करत, प्रस्तावाला मोदी सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. रामनाथ कोविंद समितीनं शिफारस केली होती की लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र व्हाव्यात लोकसभा, विधानसभेच्या एकत्र निवडणुकीनंतर 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजेच नगरपरिषदा, महापालिकांच्याही निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात. 62 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी प्रस्तावाला समर्थन दिलं तर वन नेशन वन इलेक्शनसाठी 15 पक्षांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. वन नेशन वन इलेक्शनचं विधेयक पास करण्यासाठी 2 तृतियांश खासदारांचा पाठींबा आवश्यक आहे.

कोविंद यांच्या समितीनं 191 दिवसांत 21 हजार 558 लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्यात. लोकसभेत 362 खासदार आणि राज्यसभेत 163 खासदारांची मोदी सरकारला आवश्यकता असेल भाजप आणि NDAकडे लोकसभेत 293 खासदार आहेत, त्यामुळं विधेयक पास करण्यासाठी मोठी कसरत असेल. अर्थात विधेयक पास झालं तर 2029 पासूनच वन नेशन, वन इलेक्शनला सुरुवात होईल. 2 टप्प्यात एकत्र निवडणुका घेतल्या जातील, पहिल्या टप्प्यात लोकसभेतसोबत काही राज्यांच्या आणि नंतर 1 ते दीड वर्षांच्या अंतरात असलेल्या राज्यांच्या एकत्रित निवडणुका होतील.

पाहा व्हिडिओ:-

वन नेशन वन इलेक्शनला मात्र काँग्रेसनं विरोध केलाय. भारतात हे चालणार नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी म्हटलंय. देशात सारख्याच निवडणुका आणि आचारसंहितेमुळं थांबणारी सरकारी कामं. पैसा तसंच वेळेच्या अपव्ययामुळं सोबत निवडणुका घेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्यादृष्टीनं हालचाली सुरु झाल्यात.अर्थात, मोठी परीक्षा बिल पास करण्यात असेल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.