AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वादाची ‘भरती’, सरकारवर आरोपांच्या लाटा, पहा व्हिडीओ

राज्यात सुरु असलेल्या पोलीस भरतीवरुन वादाला तोंड फुटलंय. पावसाळ्यात मैदानी चाचणी घेण्यात येतेय.. मात्र, पावसाच्या पाण्यात मैदानावर पळणार कसं? असा प्रश्न भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे ही पोलीस पावसळ्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वादाची 'भरती', सरकारवर आरोपांच्या लाटा, पहा व्हिडीओ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 21, 2024 | 10:47 PM
Share

महाराष्ट्रात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु झालीय. पावसाळ्यात ही भरती होत असल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी मैदानात पाणी साचल्यामुळे मैदानी चाचणी रखडल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होताय. अमरावतीत देखील पावसामुळे विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी रखडल्यानं विद्यार्थ्यांनी थेट मैदानाबाहेर आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.

अमरावतीत पावसामुळे मैदानी चाचणी रखडली, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रियाला सुरुवात झाली आहे. राज्यातील पोलीस भरती एकूण 17 हजार 471 जागांसाठी असून 17 लाख 76 हजार 256 अर्ज करण्यात आले आहेत.

बँड्समनपदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदासाठी भरती, चालक पदासाठी 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा निघाल्या आहेत. शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी भरती प्रक्रिया आहे. भरती प्रक्रियासाठी राज्यभरातून विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी आपल्या सेंटरवर दाखल झालेत. मात्र अनेक ठिकाणी पावसानं लावलेल्या हजेरीनंतर मैदानी चाचणी रद्द करण्यात आल्यायत. नांदेडमध्ये आज होणारी मैदानी चाचणी रदद् केल्यामुळे विद्यार्थ्यांना परत बोलवण्यात येणार आहे.

पावसाळ्यात पोलीस भरतीचं आयोजन केल्यामुळे विरोधकांनीही प्रशासनाला धारेवर धरलंय. मैदानी चाचणी होत नाही ही प्रशासनाची नामुष्की आहे. पावसाळ्यात भरती विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. दरम्यान पावसामुळे पोलीस भरतीला व्यत्यय येतोय. जिथे पाऊस आहे, तिकडे मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. पावसामुळे मैदानी चाचणी देणं शक्य नसल्याचं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटलंय. त्यामुळे प्रशासनानं भरतीचं आयोजन पावसाळ्यानंतर करावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतेय.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले