AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकर ही एक ताकद आहे, ठाकरे ही एक ताकद आहे, राज्यातील राजकारणाचं भविष्यच राऊतांनी सांगितलं…

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडक जर एकत्र येऊन राजकारण करतील तर राज्यासह देशाच्या राजकारणाची दिशी वेगळी असेल असं संजय राऊत म्हणाले.

आंबेडकर ही एक ताकद आहे, ठाकरे ही एक ताकद आहे, राज्यातील राजकारणाचं भविष्यच राऊतांनी सांगितलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 11, 2022 | 3:44 PM
Share

मुंबईः तब्बल शंभर दिवसानंतर जामीनावर बाहेर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज विविध मुद्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येतील तर राज्याचे नाही तर देशाचे चित्र बदलेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमामध्ये भेटणार असल्याने त्यांनी भविष्यातील राजकारणाची एक बाजूच स्पष्ट केली.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, ज्या प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवण्यात आले. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरही त्यांच्या हाकेला ओ देऊन ते या चळवळीत सहभागी झाले.

त्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी विषयी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रखर मतं आहेत, आणि इतिहासात तशी नोंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणि तशी इतिहासात नोंद असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्याची विनंती केली होती. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबासाहेब आंबेडकर आले होते ही इतिहासातील त्यांनी घटनाही सांगितली.

त्यामुळे बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे हे आजोबांचं नातं होते आणि ते आहे. त्यामुळे ते आता नातवापर्यंत पोहोचलेला आहे असंही त्यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनामध्ये सदैव आदर राहिला आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो आंबेडकर ही एक ताकद आहे आणि ठाकरे ही एक ताकद आहे. आणि ही ताकद जर एकत्र येईल तेव्हा महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचे चित्र वेगळे असेल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष....
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची....
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.