AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हे प्रकरण आता देशभर पेटेल”; उद्धव ठाकरे यांनी देशासमोरील राजकीय संकट सांगितलं

उद्धव ठाकरे यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

हे प्रकरण आता देशभर पेटेल; उद्धव ठाकरे यांनी देशासमोरील राजकीय संकट सांगितलं
| Updated on: Feb 20, 2023 | 3:26 PM
Share

मुंबईः शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहचला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनीही शिंदे गटावर सडकून टीका केली होती.

त्यातच आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता आपल्या वडिलांचे नाव वापरून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मात्र ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना सांगितले की, निवडणूक आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही.

त्यामुळे हा निवडणूक आयोगा बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हा राजकीय अन्याय झाला आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. पक्षाचे हे चिन्हं दिलं असलं तरी शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही, त्यामुळे निवडणू आयोगाच्या या या निर्णयाविरोधात हे प्रकरण आता देशभर पेटेल.

आज देशातील एका पक्षावर वेळ आली आहे, तर उद्या ही वेळ दुसऱ्या पक्षावरही येईल आणि पक्षही संपवतील की काय ही भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....