AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हे प्रकरण आता देशभर पेटेल”; उद्धव ठाकरे यांनी देशासमोरील राजकीय संकट सांगितलं

उद्धव ठाकरे यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

हे प्रकरण आता देशभर पेटेल; उद्धव ठाकरे यांनी देशासमोरील राजकीय संकट सांगितलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 20, 2023 | 3:26 PM
Share

मुंबईः शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहचला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनीही शिंदे गटावर सडकून टीका केली होती.

त्यातच आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता आपल्या वडिलांचे नाव वापरून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मात्र ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना सांगितले की, निवडणूक आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही.

त्यामुळे हा निवडणूक आयोगा बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हा राजकीय अन्याय झाला आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. पक्षाचे हे चिन्हं दिलं असलं तरी शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही, त्यामुळे निवडणू आयोगाच्या या या निर्णयाविरोधात हे प्रकरण आता देशभर पेटेल.

आज देशातील एका पक्षावर वेळ आली आहे, तर उद्या ही वेळ दुसऱ्या पक्षावरही येईल आणि पक्षही संपवतील की काय ही भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...