AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतली बातमी, ‘चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा’, ‘त्या’ चर्चेवेळी ठाकरेंचं मोठं वक्तव्य

"चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा", असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलं. "ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री बनेल हे सूत्र नको", असंही ठाकरे म्हणाले आहेत.

आतली बातमी, 'चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा', 'त्या' चर्चेवेळी ठाकरेंचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरे
| Updated on: Aug 22, 2024 | 7:01 PM
Share

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चेहरा नेमका कोण असेल? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. असं असताना आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याचबाबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रचाराआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हे ठरवण्याबाबत उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची आतली बातमी समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांनी याआधीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ठाकरे 2.0 सरकार असेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी याआधी केलं आहे. पण त्यास महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.

“चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलं. “ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री बनेल हे सूत्र नको”, असंही ठाकरे म्हणाले आहेत. “महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री करा. मला ते मान्य असेल. मात्र चेहरा जाहीर करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे एकमेकांच्या जागा पडल्या जातील. युतीत तेच झालं होतं. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद नको”, असं उद्धव ठाकरे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनीसुद्धा अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितली महत्त्वाची माहिती

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील औपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे. विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला असेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कुणाला कौल मिळेल हे आत्ताच सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीत मविआला शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान मिळालं नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातील मतदान मविआला झालं”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“लोकसभेत एससी समाज, मुस्लिमांचं मतदान मविआला झालं. पण विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही. विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला राहील. मी स्वत: निवडणूक लढणार नाही. अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत अजून निर्णय नाही. विदर्भात लवकरच संघटनात्मक बदल करणार. नव्या चेहऱ्यांना संधी देणार”, अशी माहिती राज ठाकरेंनी अनौपचारिक चर्चांमध्ये पत्रकारांना दिली.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.