AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसं तुमचं… राज ठाकरे यांचा यूपीएससीच्या यशवंतांना कानमंत्र

आजकाल नेते अधिकाऱ्यांना काहीही बोलत असतात. राजकारणी बदलत असतात. अधिकारी कायम असतात. राज्यात मुख्यमंत्री येत जात असतात तुम्ही तुमची बलस्थाने ओळखा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसं तुमचं... राज ठाकरे यांचा यूपीएससीच्या यशवंतांना कानमंत्र
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2023 | 1:00 PM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे. तसं तुमचं महाराष्ट्रावर असलं पाहिजे. गुजरातमध्ये अनेक गोष्टी आल्या पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं. ते वाटणं चुकीचं नाही. स्वाभाविक आहे. मोदींचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसाच तुमच्या मनातूनही महाराष्ट्र जाता कामा नये, असा कानमंत्र मनसे नेते राज ठाकरे यांनी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला. यूपीएससीत यश मिळवलेल्या तरुणांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला.

आजकाल नेते अधिकाऱ्यांना काहीही बोलत असतात. राजकारणी बदलत असतात. अधिकारी कायम असतात. राज्यात मुख्यमंत्री येत जात असतात तुम्ही तुमची बलस्थाने ओळखा. एक आयएएस अधिकारी मंत्रालयाबाहेर उभा राहुन मुख्यमंत्र्यांना जोरजोरात शिव्या देत असतो. त्यावेळी इतर लोकांनी विचारलं तुला भीती वाटतं नाही का? तर त्यावर त्याने उत्तर दिलं मुख्यमंत्री टेंपरेरी असतो मी पर्मनंट आहे, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. त्यावेळी एकच हशा पिकला.

राज्यावर प्रेम ठेवा

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनी महाराष्ट्रात आपला प्रकल्प व्हावा यासाठी आली होती. त्यावेळी विलासराव देशमुख यांना काही कारणास्तव मीटिंगसाठी उपस्थित राहणे शक्य नव्हतं. त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बैठकीसाठी पाठवले. तो अधिकारी साऊथ इंडियन होता. त्याने सुरुवातीपासूनच कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर नन्नाचा पाढा लावला आणि प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही.

कंपनी नाराज झाल्यानंतर त्याने तात्काळ आपल्या राज्यातील मित्राला फोन करून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले आणि संबंधित प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेल्याचा पाहायला मिळालं. अधिकारी म्हणून कुठेही काम करा. परंतु आपल्या राज्याबाबत प्रेम असू द्या, असंही त्यांनी सांगितलं.

यालाच लोकशाही म्हणतात

आपल्या राज्यात लोकशाही आहे आणि त्यामुळेच दहावीला 42 टक्के पडलेला माणूस आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. तुमचा सत्कार करत आहे. यालाच लोकशाही म्हणतात, अशी मिश्किल कोटीही राज यांनी केली.

मातीला विसरू नका

देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करा, पण आपल्या मातीला, महाराष्ट्राला विसरू नका. तुमच्या मनातून महाराष्ट्र कधीच जाऊ देऊ नका, असा मोलाचा मंत्रही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी ओळख करून घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.