AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishali Thakkar: मृत्यूनंतर वैशालीची शेवटची इच्छा कुटुंबीयांनी केली पूर्ण, काय होती शेवटची इच्छा?

वैशाली ठक्करच्या आत्महत्त्येने चित्रपट सुष्टीत शोककळा पसरली आहे. वैशालीने मृत्यूपूर्वी तिची अंतिम इच्छा बोलून दाखविली होती.

Vaishali Thakkar: मृत्यूनंतर वैशालीची शेवटची इच्छा कुटुंबीयांनी केली पूर्ण, काय होती शेवटची इच्छा?
वैशाली ठक्कर Image Credit source: tv9 marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 18, 2022 | 3:37 PM
Share

मुंबई,   वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) यांच्या निधनाने अभिनेत्रीच्या कुटुंबासह संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री हादरली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी वैशालीने आत्महत्या (Suicide) करून जीव दिला. नेहमी हसत-खेळत राहणारी वैशाली खूप संकटात सापडली आणि शेवटी आत्महत्या करीत आयुष्याची लढाई हरली. अनेक टीव्ही मालिकेत तिच्या अभिनयाने ती घराघरात लोकप्रिय झाली होती. वैशाली सगळ्यांची लाडकी होती. आता तिच्या चुलत भावाने वैशालीबद्दल अशी गोष्ट सांगितली आहे की, ऐकून तुम्हीही वैशालीचे नक्कीच कौतुक कराल. वैशालीच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार ती अनेकदा म्हणायची की मृत्यूनंतर तिला डोळे दान करायचे आहेत. ही गोष्ट वैशालीने तिच्या आईलाही अनेकदा सांगितली होती.  दृष्टीहिनाला तिच्या सुंदर डोळ्यांनी हे जग पाहता यावे यासाठी वैशालीच्या कुटुंबीयांनी रविवारी  अंत्यसंस्काराच्या आधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना वैशालीचे डोळे दान केले आहेत.

वैशालीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा

वयाच्या 30 व्या वर्षी वैशालीने आपले जीवन संपवले. पण जातानाही तिने कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश भरला. यावरून ती किती चांगल्या मनाची होती हे दिसून येते. वैशालीचे 20 ऑक्टोबरला लग्न होणार होते. तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. वैशालीच्या घरात आनंदाचे दार ठोठावणार होते, पण लग्नाच्या सनईपूर्वीच वैशालीच्या घरात तिच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. वैशालीच्या मृत्यूने अभिनेत्रीचे कुटुंब हादरले आहे. तिच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.

एका तरुण मुलीच्या मृत्यूमुळे वैशालीचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, आरोपीला शिक्षा व्हावी अशी कुटुंबीयांची इच्छा आहे. राहुल वैशालीचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. तिला धमकवायचा. राहुलच्या जाचाला कंटाळूनच वैशालीने मृत्यूला कवटाळले असा कुटुंबीयांचा आरोप आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?