AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वंचित आघाडी-शिवसेना युती देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल”; ठाकरे गटाच्या नेत्याने युतीचा नवा अर्थ सांगितला

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबादेमध्ये जोरदारपणे जल्लोष करण्यात आला आहे.

वंचित आघाडी-शिवसेना युती देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल; ठाकरे गटाच्या नेत्याने युतीचा नवा अर्थ सांगितला
| Updated on: Jan 24, 2023 | 10:34 PM
Share

औरंगाबादः महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकाची रिक्षा म्हणून विरोधकांकडून टीका केली जात होती. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर आता रिक्षाला आणखी एक चाक मिळाले असल्याचे सांगत या युतीचा गौरव केला होता.

तर आज ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती ही देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला आहे. त्यामुळे ही युती राज्यात वेगळा प्रयोग ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबादेमध्ये जोरदारपणे जल्लोष करण्यात आला आहे. त्यामुळे ही युती राजकारणासह सामाजिक चळवळीत वेगळा ठसा उमटविणार असल्याचा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

ही युती झाली असल्यामुळेच आणि वंचित आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची युती ही देशात नव्या परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. या युतीमुळेच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे.

सध्या देशात सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे. त्याला नवी दिशा देण्याासठी या युतीच्या माध्यमातून बळ मिळणार आहे. ही युती राजकीय नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडवणार आहे.त्यामुळेच विरोधकांकडून यावर टीका केली जात असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

तर शिंदे गट आणि शिवसेनेचा सुरु असलेल्या वादावर मत व्यक्त करताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, ज्यांच्या गळ्यात अपात्रतेची टांगती तलवार लटकलेली आहे तिच लोकं सुप्रीम कोर्टात गेली आहेत असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.