AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वंचित आघाडी-शिवसेना युती देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल”; ठाकरे गटाच्या नेत्याने युतीचा नवा अर्थ सांगितला

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबादेमध्ये जोरदारपणे जल्लोष करण्यात आला आहे.

वंचित आघाडी-शिवसेना युती देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल; ठाकरे गटाच्या नेत्याने युतीचा नवा अर्थ सांगितला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 24, 2023 | 10:34 PM
Share

औरंगाबादः महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकाची रिक्षा म्हणून विरोधकांकडून टीका केली जात होती. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर आता रिक्षाला आणखी एक चाक मिळाले असल्याचे सांगत या युतीचा गौरव केला होता.

तर आज ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती ही देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला आहे. त्यामुळे ही युती राज्यात वेगळा प्रयोग ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबादेमध्ये जोरदारपणे जल्लोष करण्यात आला आहे. त्यामुळे ही युती राजकारणासह सामाजिक चळवळीत वेगळा ठसा उमटविणार असल्याचा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

ही युती झाली असल्यामुळेच आणि वंचित आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची युती ही देशात नव्या परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. या युतीमुळेच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे.

सध्या देशात सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे. त्याला नवी दिशा देण्याासठी या युतीच्या माध्यमातून बळ मिळणार आहे. ही युती राजकीय नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडवणार आहे.त्यामुळेच विरोधकांकडून यावर टीका केली जात असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

तर शिंदे गट आणि शिवसेनेचा सुरु असलेल्या वादावर मत व्यक्त करताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, ज्यांच्या गळ्यात अपात्रतेची टांगती तलवार लटकलेली आहे तिच लोकं सुप्रीम कोर्टात गेली आहेत असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान