AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetables Price : टोमॅटोची शतकी खेळी तर कांदे, बटाटाने पूर्ण केली हाफ सेंच्युरी, दरवाढीमुळे बिघडले किचन बजेट

Vegetables Price Hike : मध्यंतरी ओढ दिल्यानंतर पावसाने पुन्हा दमदार बॅटिंग केली. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतींवर दिसून येत आहे. देशातील अनेक शहरांत आणि ग्रामीण भागातही टोमॅटो, बटाटे आणि कांद्याची किंमत वाढली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

Vegetables Price : टोमॅटोची शतकी खेळी तर कांदे, बटाटाने पूर्ण केली हाफ सेंच्युरी, दरवाढीमुळे बिघडले किचन बजेट
भाजीपाला कडाडला
| Updated on: Jul 03, 2024 | 12:06 PM
Share

देशात मान्सून सक्रिय झाला आहे. उत्तर भारताला आणि मध्य भारतात पावसाने दमदार हजेरी लावली. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतींवर दिसून येत आहे. भाजीपाल्याच्या किंमती वधारल्या आहेत. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, कांदे आणि बटाट्याच्य किंमती वाढल्या आहेत. ग्राहक मंत्राल्याच्या साईटनुसार, भाजीपाला, तांदळासह डाळींचे भाव वाढल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

असे आहेत भाव

यंदा तीव्र उन्हाळ्याने भाजीपाला उत्पादन घटले होते. तर आता मान्सूनमुळे भाजीपालाचे भाव वधारले आहेत. टोमॅटोचे कमाल भाव 130 रुपयांवर पोहचले. तर कांद्याची किंमत 90 रुपये किलो झाली. तर भाजीपाल्यासहीत इतर खाद्यान्नाच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किंमतींनी देशात शतक ठोकले आहे. तर इतर भाजीपाल्याने अर्धशतक पूर्ण केले आहे.

किती महागले टोमॅटो, कांदा आणि बटाटे

ग्राहक मंत्रालयाच्या साईटनुसार, 2 जुलै रोजी बटाटाच्या कमाल भाव 80 रुपये किलो, कांद्याचा कमाल भाव 90 रुपये किलो तर टोमॅटोचा कमाल भाव 130 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला होता. मान्सूनमुळे देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव 100 रुपयांच्या घरात पोहचला. तर सरासरी भाव 54.50 रुपये आहे. अंदमान निकोबार बेटावर टोमॅटोचा भाव सर्वाधिक आहे. कांदा काही शहरात 60 रुपये तर बटाटे 61.67 रुपये किलो दराने विक्री होत आहे.

का महागला भाजीपाला

सरकारी आकडेवारीनुसार, मंगळवारी भाजीपाल्याचे दर सरासरीपेक्षा अधिक होते. उत्तर भारतात टोमॅटो महागला. तर कांदा 45 ते 50 रुपये किलो दराने विक्री होत होता. तर बटाट्याची किंमत पूर्वी 10 ते 12 रुपये किलो होती. तो भाव आता 40 रुपये किलोवर पोहचला. देशातील काही भागात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.

मान्सून दाखल होताच कडाडले भाव

उष्णतेच्या लाटांमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले तर आता पावसामुळे भाजीपाल्यासह डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. बटाटे, टोमॅटो, कांदा, लसूण आणि इतर भाजीपाल्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आता मान्सून दाखल झाला आहे. पण वाहतुकीतील अडचण, साठवणुकीची समस्या आणि पावसामुळे भाजीपाला लवकर खराब होतो. आवक घटल्याने भाजीपाला महागला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.