AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवली पाणी पुरवठा विस्कळीत, बिघाडच सापडत नसल्याने दिवाळीपूर्वी नागरिकांची पाण्यासाठी वणवण

kalyan dombivali municipal corporation: मागील चार दिवसांपासून दिवस रात्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या टीमकडून हा बिघाड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र बिघाडच सापडत नसल्याने अपुऱ्या पाण्याची समस्या दूर करायची तरी कशी? असे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

कल्याण-डोंबिवली पाणी पुरवठा विस्कळीत, बिघाडच सापडत नसल्याने दिवाळीपूर्वी नागरिकांची पाण्यासाठी वणवण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 20, 2024 | 11:23 AM
Share
Kalyan-Dombivli Water Cut: कल्याण शहराला पाणी पुरवठा पुरवठा करणाऱ्या उद्चन केंद्रातील मशिनरीमध्ये बिघाड झाल्याने अतिशय कमी दाबाने पाण्याची उचल होत आहे. यामुळे कल्याण शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हा बिघाड शोधण्याचा प्रयत्न अधिकाऱ्याकडून सुरु आहे. मात्र बिघाड सापडत नसल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणी टंचाई उद्भवल्याने नागरिकाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ही समस्या पुढील दोन दिवसांत सुटेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बिघाडच सापड नसल्याने अडचण

काही दिवसावर आलेला दिवाळी सण आणि विधानसभा निवडणुकीची आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचे संकट उद्भवल्याने अधिकाऱ्यांची देखील भंबेरी उडाली आहे. दरम्यान उल्हास नदीवरून पाणी उचलणाऱ्या मोहने उद्चन केंद्रातील मशिनरीमध्ये बिघाड झाल्याने पाण्याची उचल संथ गतीने होत आहे. यामुळे शहरात अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मागील चार दिवसांपासून दिवस रात्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या टीमकडून हा बिघाड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र बिघाडच सापडत नसल्याने अपुऱ्या पाण्याची समस्या दूर करायची तरी कशी? असे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

पाणी कपात होणार नाही

दरम्यान संपूर्ण टीमकडून बिघाड शोधून तो दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर कोणतीही पाणी कपात लादण्याचा महापालिकेचा प्रयत्न नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा नदीत आणि धरणात देखील पुरेसा पाणी साठा असल्याने पाणी कपातीची सध्या तरी आवश्यकता भासणार नाही. मात्र मशिनरीत निर्माण झालेल्या बिघाडामुळे नागरिकांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास साहन करावा लागत आहे. पुढील दोन दिवसांत ही समस्या सुटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नागरिकांनी हा बिघाड त्वरित दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...