Eknath Shinde : कामाख्या मंदिर… जिथे तंत्र-मंत्राच्या सहाय्यानं विजय प्राप्तीचा मिळतो आशीर्वाद; एकनाथ शिंदेंसह बंडखोरांची इच्छा होणार पूर्ण?

आमच्याकडे 40 अधिक 10 असे 50 लोक आहेत. म्हणजेच 50 आमदार आमच्यासोबत असून आम्ही बहुमतात आहोत. दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आमच्या गटाकडे आहे. त्यामुळे विधानभवनातील बहुमत चाचणीची आम्हाला काहीही चिंता नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : कामाख्या मंदिर... जिथे तंत्र-मंत्राच्या सहाय्यानं विजय प्राप्तीचा मिळतो आशीर्वाद; एकनाथ शिंदेंसह बंडखोरांची इच्छा होणार पूर्ण?
कामाख्या देवीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:07 PM

मुंबई : बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, असा विश्वास शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. आसाममधील गुवाहाटी याठिकाणी असलेल्या कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यानंतर त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. कोणालाही जबरदस्ती केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. तंत्र, मंत्राच्या सहाय्याने विजय प्राप्त करण्यासाठी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर इच्छा पूर्ण होतात, अशी अख्यायिका आहे. आता या सर्व बंडखोरांना यश मिळणार का, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान आम्ही सर्वांनी कामाख्या देवीचे (Kamakhya Temple) दर्शन घेतले आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे. श्रद्धापूर्वक आम्ही माँ कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. सर्व आमदार मोकळेपणाने याठिकाणी फिरत आहेत. कोणालाही जबदरस्ती केलेली तुम्ही पाहिली का, असा सवाल त्यांनी विचारला. उद्या आम्ही सर्व आमदार (Rebel MLAs) मुंबईत पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

कामाख्या पीठ सिद्ध स्थान

गुवाहाटीतील कामाख्या देवीचे मंदिर असे ठिकाण आहे, ज्याठिकाणी निवडणुकीतील विजय आणि आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे. तंत्र-मंत्राचे महापीठ मानले जाणारे कामाख्या पीठ सिद्ध स्थान मानले जाते. त्यामुळे राजकीय नेत्यांची याठिकाणी दर्शनासाठी गर्दी नेहमीच होत असते. आता महाराष्ट्रातील नेत्यांनीही कामाख्या देवीसमोर डोके ठेवत आशीर्वाद मागितले आहेत. तसेच पूरग्रस्तांसाठीही साकडे घालत हे संकट दूर व्हावे, म्हणून प्रार्थना केली.

‘बहुमत आमच्याकडेच’

देवीच्या दर्शनानंतर ते म्हणाले, आमच्याकडे 40 अधिक 10 असे 50 लोक आहेत. म्हणजेच 50 आमदार आमच्यासोबत असून आम्ही बहुमतात आहोत. दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आमच्या गटाकडे आहे. त्यामुळे विधानभवनातील बहुमत चाचणीची आम्हाला काहीही चिंता नाही. जी कोणती परीक्षा असेल, त्यात आम्ही पूर्णपणे पास होऊ. आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. लोकशाहीत आकडे आणि बहुमताला विशेष महत्त्व आहे. या देशात घटना, कायदे आणि नियम यापुढे कोणालाही जाता येणार नाही, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार’

मुंबईला पोहोचल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणार. शिवाय धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनीही वंदन करणार, असे सांगतानाच ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही हिंदुत्त्वाला पुढे नेणारी शिवसेना आहे. ही धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना पुढे नेणारी शिवसेना आहे. या राज्यातील जनतेला सुखी, समृद्धी, समाधानी ठेवण्यासाठी, राज्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी, राज्याचा विकास करण्यासाठी, राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना प्रयत्न करीत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी आसाममधील जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी शिंदे गटातील आमदारांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदत केल्याची माहितीही त्यांनी दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.