AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं. काय ठरलं, हे उद्धव ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीत सांगितलं.. त्यानंतर फडणवीसांनीही गौप्यस्फोट केलाय. त्याच बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाहांसमोरच उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेत असल्याचं मला सांगितलं असा दावा फडणवीसांनी केलाय.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?
| Updated on: May 17, 2024 | 10:59 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन, अमित शाहांनी बाळासाहेबांच्या खोलीत काय म्हटलं. नेमकं काय ठरलं होतं याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीत केला आहे. त्यावर फडणवीसांनीही नवे गौप्यस्फोट केले आहेत. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द कुठून आला ? आणि अमित शाह मातोश्रीवर येण्याआधीच कशी चर्चा थांबली हेही सांगितलं.

चर्चा थांबल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंनीच मध्यर्थ्याद्वारे मेसेज पाठवला आणि पुन्हा चर्चा सुरु झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंचा दाव्यावर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. स्वत: अमित शाहांसमोर उद्घव ठाकरेंनी मला, मी यू टर्न घेतो असं सांगितलं. आणि शिवसैनिकांना काही तरी मिळाल्यासारखं वाटेल असं पत्रकार परिषदेत बोला, हे उद्घव ठाकरेंनीच सांगितल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे..

जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच होता…तर मग त्यांनी जाहीरसभेतून का सांगितलं नाही, हे आतापर्यंत अमित शाह आणि फडणवीस विचारत होते…पण TV9च्या मुलाखतीतून त्यावर उद्धव ठाकरे बोलल्यानंतर आता 5-6 वर्षांनी सूचलं का असा सवाल फडणवीसांनी केला.

सुरुवातीचे अडीच वर्षे भाजपचेच होते आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्यानं आपण जाहीरसभेतून बोललो नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले मग, त्यावेळी माझा फोन का घेतला नाही ?, असा सवाल फडणवीसांनी केलाय.

आपण अडीच वर्षांचा शब्द दिलाच नाही, हे भाजपकडून नाकारलं जातंय. पण आई वडिलांसह उद्धव ठाकरे तुळजाभवनाची शपथ घेत आहेत. TV9च्या मुलाखतीतही उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला होता. पुढच्या 6 महिन्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत..पण अजूनही 2019च्या निवडणुकीआधी बाळासाहेबांच्या खोलीतल्या बोलणीवरुन अजूनही खलबतं सुरुच आहे. ज्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली. पुढे शिवसेनेही फुटली. त्यावरुन उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या मुलाखतीतून दोघांच्याही बाजू समोर आल्यात.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.