AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांसोबत गेल्यानंतर काय घडलं?; रामदास आठवले म्हणतात, “महाविकास आघाडीत…”

महाविकास आघाडीत धूसफूस सुरूच आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. त्यानंतर आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेशी मी सहमत नाही. शरद पवार हे माझे चांगले मित्र आहेत.

उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांसोबत गेल्यानंतर काय घडलं?; रामदास आठवले म्हणतात, महाविकास आघाडीत...
रामदास आठवले
| Edited By: | Updated on: Jan 28, 2023 | 9:14 PM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) गेले असले तरी त्याला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येणार नाही, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केलं. शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात झाला होता. शिवसेना-भाजप आणि आठवले गट एकत्र होते. तो खरा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग होता. त्या काळात शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग यशस्वी झाला होता. उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांच्या एकत्रीकरणाला शिवशक्ती-वंचित शक्ती असं म्हणता येऊ शकेल. दे दोघे एकत्र आले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काही फरक पडणार नाही, असंही आठवले यांनी सांगितलं.

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. माझी युती ही शिवसेनेसोबत आहे. महाविकास आघाडीसोबत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत जायचं आहे की, शिवसेनेसोबत राहायचं आहे, हा प्रकाश आंबेडकर यांचा विषय आहे, असंही आठवले म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबत वैचारिक मतभेद असल्याचं म्हटलं. आम्ही कायमचे शत्रू नसल्याचंही त्यांनी म्हंटलं. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र आलो. आत्मनिर्भर भारत करण्याची मोदी यांची भूमिका आहे.

…तर त्यांनी भाजपसोबत यावं

प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती तोडावी आणि भाजपसोबत यावं. तर त्याला आमची काही हरकत नसल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, तर प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबत आलं पाहिजे, असा सल्ला दिला.

रामदास आठवले यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीत धूसफूस सुरूच आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. त्यानंतर आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेशी मी सहमत नाही. शरद पवार हे माझे चांगले मित्र आहेत.

यासाठी शरद पवार यांचं सहकार्य

शरद पवार हे राजकीयदृष्ट्या नेहमी अॅक्टिव्ह राहतात. मराठवाडा नामांतराचा प्रश्न होता. तो सोडविण्यास शरद पवार यांचं सहकार्य मिळालं आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमिका ते मांडत आले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांना काय झालं माहीत नाही. संजय राऊत यांना ओळखत नाही म्हणतात. दुसरीकडं शरद पवार यांच्यावर टीका करतात. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना शिवसेनेबरोबर राहायचं आहे की, नाही, याबाबत मी साशंक असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हंटलं.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.