‘भाजपची सत्ता असताना खडसेंकडे मंत्रिमंडळातील 10 खाती होती; ओबीसींचा यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो?’

Pravin Darekar | फडणवीस सरकार सत्तेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे महत्त्वाची दहा खाती देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामविकासचं खातं दिलं गेलं.

'भाजपची सत्ता असताना खडसेंकडे मंत्रिमंडळातील 10 खाती होती; ओबीसींचा यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो?'
प्रविण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:25 PM

मुंबई: महाराष्ट्रात भाजप सरकार होतं त्यावेळेस एकनाथ खडसे यांच्याकडे दहा खाती तर पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्राम विकास खातं दिलं होतं. आजही पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजप नेत्या म्हणून राज्यात उत्तम नेतृत्व करत आहेत. आज देशाचे पंतप्रधान ओबीसी (OBC) समाजाचे असून याहून ओबीसींचा मोठा सन्मान काय असेल, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. (BJP leader Pravin Darekar hits back Shivsena accusations over OBC reservation)

ते सोमवारी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांना डावलण्यात आल्याच्या शिवसेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. फडणवीस सरकार सत्तेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे महत्त्वाची दहा खाती देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामविकासचं खातं दिलं गेलं. आज ही त्या राष्ट्रीय स्तरावर भाजप नेत्या म्हणून ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.

महाविकासआघाडीत अंतर्गत धुसफूस

प्रविण दरेकर यांनी ‘सामना’च्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली. वाघ कधी कुणाच्या इशाऱ्यावर चालत नाही तो फक्त सर्कसमध्येच चालतो. निधर्मवादीचे ढोल बडवणाऱ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार पणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. या सरकारने ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर आली, असा टोला दरेकर यांनी यावेळी लगवला.

‘ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता…?’

रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना रोकडा सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल, नाना पटोलेंचा पलटवार

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल, मी स्वत: त्यांना भेटेन : संजय राऊत

काँग्रेसने सातत्याने ओबीसींवर अन्याय केला, म्हणून वडेट्टीवारांनी खदखद व्यक्त केली, प्रवीण दरेकरांचा टोला

(BJP leader Pravin Darekar hits back Shivsena accusations over OBC reservation)

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.