AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं काय घडलं की अब्दुल सत्तार शिवीगाळ करण्याइतपत चिडले? वाचा Inside Story

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

असं काय घडलं की अब्दुल सत्तार शिवीगाळ करण्याइतपत चिडले? वाचा Inside Story
| Updated on: Nov 07, 2022 | 6:46 PM
Share

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागावी. तसेच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. या सगळ्या गदारोळाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या महिला आयोगाने देखील घेतली आहे. हे प्रकरण चिघळण्यामागे सत्तार यांची टीका करताना जीभ घसरली हेच कारण आहे. पण सत्तार सुप्रिया सुळेंवर इतके का चिडले? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. या सगळ्या एकामागे एक घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

राज्यात साडेतीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालंय. एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून बंडखोरी करुन भाजपची साथ धरली.

दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर विरोधकांकडून बंडखोर आमदारांवर 50 खोके (पैसे) घेतल्याचा आरोप केला जातोय. पैशांसाठी आमदारांनी बंडखोरी केली, असा आरोप केला जातोय.

सुप्रिया सुळे यांनी नुकतंच आपल्या भाषणात सत्ताधारी शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोपांबाबत टीका केली होती. “50 खोक्यांचा आरोप केला जातोय. पण त्यावर कोणी म्हटलंच नाही की घेतले नाहीत. एकही जण अजूनपर्यंत घेतले नाही म्हटलं नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

“मला जर कोणी म्हटलं असेल की सुप्रिया सुळे तुम्ही पक्क केलं तर मी नोटीस पाठवेन. आशिष देशमुख नोटीस तयार करा आणि पाठवा. मी कुणाचे 50 खोके घेतले नाहीत”, अशी टीका सुप्रिया यांनी केली.

“एक मंत्री असं म्हणाले की तुम्हाला 50 खोके हवेत का? तर तुम्ही घेतले असेल तरंच तुम्ही म्हणाल ना की तुम्हाला हवेत का”, असा टोला त्यांनी लगावला.

“मी आज दर्शनाला गेले आणि दुसऱ्या कुणाला विचारलं की तू दर्शनाला जाऊन आला का? तो म्हटला, तुला जायचंय का? तर चल मी सोय करतो. तोपर्यंत ठीक आहे पण तुम्हालाही पाहिजेत का 50 खोके? आज गावागावत गेलंय. याचा अर्थ लोकांपर्यंत गेलंय की, हो या लोकांनी 50 खोके घेतलेय”, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.

सुप्रिया सुळे यांच्या टीकेवरच अब्दुल सत्तार यांना आज एका पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा त्यांची जीभ घसरली. त्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापलं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.