AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली; किशोरी पेडणेकरांनी केली भाजपची पोलखोल

मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर तावडे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली; किशोरी पेडणेकरांनी केली भाजपची पोलखोल
kishori pendekar news Image Credit source: tv9
| Updated on: Aug 19, 2026 | 12:11 PM
Share

मुंबई महापालिकेच्या एका निर्णयाने महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मुंबईच्या महापौर तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च केला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली आहे. मुंबईकरांच्या पैशांची लूट चालली आहे. असे अनेक ठराव लूट करत असल्याचे म्हणत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि महापौर रितू तावडे यांच्यावर टीका केली आहे.

ठाकरे गटाच्या नगरसेवक किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. किशोर पेडणेकर म्हणाल्या, ‘सतत महापौरांवर बोलण्याचा कंटाळा आला आहे. त्यांचे प्रतापच असे आहेत. किती मांडावे आणि किती झाकावेत. माझ्याकडे स्थायी समितीचा प्रस्ताव आहे. त्यात म्हटलं की, महापौरांच्या कार्यालयाच्या सोशल मीडिया सांभाळण्यासाठी 25 लाख खर्च होणार आहे. त्याच्याआधी 10 लाख आणि त्याहून जास्त खर्च झाला. आता 25 लाखांहून अधिक खर्चाचा प्रस्ताव आहे’.

‘मी ऐकत आहे की , महापौर म्हणत आहे की, हे माझं नाही. तीन तिघाडी काम बिघाडी, असे चाललं आहे का? स्थायी समिती काय बोलते हे सभागृह नेत्यांना माहिती नाही. सभागृह नेते काय बोलतात हे महापौरांना माहीत नाही. महापौर काय बोलतात हे दोघांनाही माहिती नाही. आमच्याबरोबर संवाद नाही. नेमकं चाललं काय? करदात्यांचा पैसा सर्वत्र खर्च केला जातो. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 45 लाख वापरले जात असतील, तर प्रसिद्ध म्हणजे काय? भटजी, मुनींना भेटणे प्रसिद्धी आहे का? महापालिकेनेही ठरवलं पाहिजे. पालिका बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

‘एकतर प्रशासन खोटं बोलत असेल. तर महापौर खरं बोलत असेल. किंवा महापौर खोटे बोलत असेल आणि प्रशासन खरं बोलत असेल. आता प्रशासनाने सांगाव. काल असंच चाललं. आता प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोण खरं बोलतंयत, कोण खोटं बोलतंय…मुंबईकरांच्या पैशांची लूट का करतंय? हे 5-75 बोगस आहे. डायरेक्ट एक कोटीला जायचं नाही. असे ठराव आणून लोकांची लूट करायची. माझ्या हातातील पेपरमध्ये उघड उघड लिहिलं आहे की, हा पेपर माझ्या घरचा नाही. हा पालिकेच्या कामकाजाचा पेपर आहे. भाजपने एक नवीन पद्धत काढली आहे. 5 लाख ते 75 लाखांपर्यंतच काम स्थायी समितीत आणून पास करायचं, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.

Follow Us
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक