AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली?: राष्ट्रवादी

तुमच्या 'ईडी'च्या कारवाईला कोण घाबरतंय? यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. | Nawab Malik

तेव्हा पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली?: राष्ट्रवादी
| Updated on: Dec 28, 2020 | 10:20 AM
Share

मुंबई: महाराष्ट्रासाठी ईडीचा (ED) खेळ हा नवा नाही. भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जाते. या माध्यमातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. (NCP leader Nawab Malik takes a dig at BJP over ED notice to Sanjay Raut’s wife)

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी सोमवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. तुमच्या ‘ईडी’च्या कारवाईला कोण घाबरतंय? यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. मग ही नोटीस मागे का घेतली, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला. तसेच सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपला सत्ता मिळेत, असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असेही मलिक यांनी म्हटले.

प्रत्येक राज्यावर भाजप सरकारकडून दबाव आणण्याचा प्रयत्न

भाजपकडून प्रत्येक राज्यात दबावतंत्र वापरले जात आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना पैसे दिले जात नाहीत. राज्यातील प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले जातात. अरूणाचल प्रदेशात ‘जदयू’सोबत काय झाले ते पाहा. बिहारच्या निवडणुकांसाठी सुशांत सिंहच्या आत्महत्येचं भांडवल करण्यात आलं. भाजपने त्यासाठी सीबीआयचा कशाप्रकारे वापर केला, हे देशाला माहिती असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

‘प्रकाश आवाडे आणि फडणवीसांच्या भेटीत राजकारण नाही’

कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दोन आमदरांची भेट घेतली. मात्र, ही भेट वैयक्तिक संबंधातून झाली. त्यामध्ये कोणतंही बेरजेचं राजकारण आहे, असं वाटत नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी: राऊत

राजकारणात दोन घ्यावे आणि दोन द्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

मोदी सरकारचे भाग्य असेल की, आज विधी बाकांवर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते, अशा शब्दांत सामनातील अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला.

(NCP leader Nawab Malik takes a dig at BJP over ED notice to Sanjay Raut’s wife)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.