AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, मात्र 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं

नागपूर जिल्ह्यात 1300 गावांना वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे

नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, मात्र 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं
| Updated on: Oct 29, 2020 | 9:53 AM
Share

नागपूर : नागपूर जिल्ह्यात 1300 गावांना वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे (Nagpur District 1300 Villages). तर दुसरीकडे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे (Nagpur District 1300 Villages).

नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 342 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 94 हजार 575 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर असली, तरीही जिल्ह्यातील 1867 गावांपैकी तब्बल 1300 गावांनी कोरोनाला गावाच्या वेशीवरंच रोखलं आहे.

गेल्या सात महिन्यात या 1300 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला नाही. एप्रिल, मे, जून आणि जुलै या काळात नागपूर शहरातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यावेळेस खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बऱ्याच गावांनी आपल्या सीमा सील केल्या होत्या. नवीन व्यक्तीला गावात प्रवेश नव्हता, गावातून शहरात जाण्याचं प्रमाण कमी केलं होतं, त्याचंच यश म्हणून आजपर्यंत तब्बल सात महिने गावकऱ्यांनी जिल्ह्यातील 1300 गावांमध्ये कोरोनाला शिरकाव करु दिला नाही (Nagpur District 1300 Villages).

जिल्हा परिषदेच्या जनजागृतीचा गावांना फायदा या गावांना झाला. त्यामुळे 1300 गावांनी गावामध्या कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही.

नागपूर जिल्ह्यातील 1300 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यात नागपूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असताना, गावांमध्ये जनजागृती, बाहेरुन आलेल्या व्यक्तीला सक्तीनं 14 दिवस क्वॉरंटाईन करणे आणि गावं सुरक्षित राहिल याची काळजी घेणे. या सर्व बाबींकडे जिल्हा परिषदेनं जातीनं लक्ष दिलं. त्यामुळेच सात महिन्यात जिल्ह्यातील या 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरंच रोखलं.

Nagpur District 1300 Villages

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी ठरण्याची शक्यता, युके वॅक्सिन टास्क फोर्स अध्यक्षांचा दावा

आनंदाची बातमी: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.