AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किन्ही मोखे गावावर शोककळा, 17 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जळाले, 33 एकरातल्या धानाची झाली राखरांगोळी

शनिवारी रात्री अज्ञान व्यक्तींनी ही आग लावली. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मंडल अधिकारी हलमारे यांनी पंचनामे केले. आग लावणारा एकटा व्यक्ती नसावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. पुंजण्याला आग सहसा लावली जात नाही.

किन्ही मोखे गावावर शोककळा, 17 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जळाले, 33 एकरातल्या धानाची झाली राखरांगोळी
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 22, 2021 | 11:46 AM
Share

भंडारा : जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या धान घरी आणून आनंदोत्सव साजरे करण्याचे दिवस आहेत. पण, शनिवारी रात्री किन्ही मोखे गावातल्या 17 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले. त्यामुळं गावात शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्री अज्ञान व्यक्तींनी ही आग लावली. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मंडल अधिकारी हलमारे यांनी पंचनामे केले. आग लावणारा एकटा व्यक्ती नसावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. पुंजण्याला आग सहसा लावली जात नाही. गावातील राजकारण किंवा एखादी दुष्मणी याला कारणीभूत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. धान कापल्यानंतर त्याचे पुंजणे रचून शेतातच ठेवले जातात. धान चुरल्यानंतर धान घरी आणले जाते किंवा सरळ धान खरेदी केंद्रांवर नेले जाते.

गावात पोलीस बंदोबस्त

दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनेनंतर तणाव निर्माण होऊ नये, म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढण्यात आलाय. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर चुरणे करू, असे शेतकऱ्यांना वाटत होते. कारण धान चुरून पुन्हा घरी आणल्यानंतर धान खरेदी केंद्रावर न्यावे लागतात. त्यात वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात.

शासनाकडून मदतीची मागणी

अज्ञान व्यक्तीने हे धानाचे पुंजणे जाळले. यात 17 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळं सरकारनं नुकसानभरपाई म्हणून एकरी 25 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत.

निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गेल्या वर्षीही धानाच्या पुंजण्याला आग लावण्यात आली होती. त्या घटनेतील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. यंदाही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या आरोपींना अटक करून शिक्षा होणार की, नाही काही सांगता येत नाही. त्यामुळं आरोपींचा शोध लागला नाही, तर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. धान घरी येणार म्हणून शेतकरी खुश होते. परंतु, त्यांच्या आनंदावर या घटनेमुळं विरजण पडले आहे. आता धानावर मिळालेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. निदान कर्ज माफ करावा, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.

भाजप नेते छोटू भोयर यांनी का सोडला पक्ष?, पक्षात मोठी खदखद असल्याचा आरोप

नागपुरात युवा सेनेच्या नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत केला होता सेनेत प्रवेश

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा