AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Social media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम

ॲाक्टोबर महिन्यात 20 लाख 69 हजार व्हॅाट्सॲप अकाउंट बंद केल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. त्यामुळं केंद्र सरकारचे नवीन आयटी नियम आलेत. आता सोशल मीडियाचा जपून वापरा, असा सल्ला दिलाय सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी.

Social media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 9:02 PM
Share

नागपूर : सोशल मिडियापर सबकुछ चलता है अशा आविर्भावात समाजात द्वेष पसरवणाऱ्यांनी सावध होण्याची वेळ आली आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांचा स्वीकार करत, व्हॅाट्सॲपने 20 लाखांपेक्षा जास्त अकाउंट बंद केले आहे. केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला आपला अहवाल सादर करावा लागतो. यानुसार व्हॅाट्सॲपनं नुकताच ॲाक्टोबर महिन्याचा अहवाल सादर केलाय. त्यात ॲाक्टोबर महिन्यात 20 लाख 69 हजार व्हॅाट्सॲप अकाउंट बंद केल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. त्यामुळं केंद्र सरकारचे नवीन आयटी नियम आलेत. आता सोशल मीडियाचा जपून वापरा, असा सल्ला दिलाय सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी.

दर महिन्याला रिपोर्ट सादर करणे आवश्यक

व्हॅाट्सॲपनं 20 लाखांपेक्षा जास्त अकाउंट बंद केले आहे. केंद्र सरकारच्या नवीन आयटी नियमानुसार ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबूक अशा प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला प्रत्येक महिन्याला रिपोर्ट सादर करणे अनिवार्य केले आहेत. यानुसार समाजात द्वेष पसरवण्यासोबतच अश्लील संदेश आणि बदनामी करणाऱ्या अकाउंटवरही नजर ठेवली जाणार आहे. व्हॅाट्सॲपसोबतच इतर समाजमाध्यमंही अशीच कारवाई करणार आहेत. त्यामुळं जातीय द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेज सेंट करताना किंवा फॅारवर्ड करताना खबरदारी घ्यायची आहे. नाहीतर तुमचं सोशल मीडिया अकाउंट बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असं आवाहन सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे यांनी केलंय.

वापरकर्त्यांबाबत तक्रार आल्यास कारवाई

द्वेष पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर तीन टप्प्यांत कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला नोंदणी करताना तुमचा डेटा तपासला जातोय. त्यानंतर मॅसेज पाठवताना किंवा येणाऱ्या मॅसेजवर वॅाच ठेवला जातोय. आणि तिसरा टप्पा म्हणजे सोशल मीडिया वापरकर्त्यांबाबत तक्रार आल्यास ही कारवाई केली जात असल्यास सायबरतज्ज्ञ अजित पारसे सांगतात.

आयटी कायद्याचं पालन करणं गरजेचं

भारतात व्हॅाट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या 48 कोटी आहे. यापैकी काही जण व्हॅाट्सॲपचा वापर करताना अक्षरशः मोकाट सुटायचे. मनात येईल ते मॅसेज पाठवायचे. यातूनच अमरावती आणि नांदेडसारख्या घटना घडल्यात. पण आता नव्या आयटी कायद्याचं सर्व सोशल मीडिया कंपन्यांना पालन करणं गरजेचं आहे. याची सुरुवात व्हॅाट्सॲपने केलीय. द्वेषमूल मॅसेज पसरवणाऱ्यांचे अकाउंट कायमचे बंद केले. ही वेळ तुमच्यावर येणार नाही. याची दक्षता घेणं गरजेचं आहे.

Nagpur Crime वाढल्या होत्या घरफोड्या, पोलिसांसमोर होतं आव्हान, 3 गँगच्या मुसक्या आवळल्या

Nagpur Crime चोरी करायला आले, मार खाऊन गेले, वाचा कसा घडला थरार!

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....