Social media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम

ॲाक्टोबर महिन्यात 20 लाख 69 हजार व्हॅाट्सॲप अकाउंट बंद केल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. त्यामुळं केंद्र सरकारचे नवीन आयटी नियम आलेत. आता सोशल मीडियाचा जपून वापरा, असा सल्ला दिलाय सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी.

Social media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 9:02 PM

नागपूर : सोशल मिडियापर सबकुछ चलता है अशा आविर्भावात समाजात द्वेष पसरवणाऱ्यांनी सावध होण्याची वेळ आली आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांचा स्वीकार करत, व्हॅाट्सॲपने 20 लाखांपेक्षा जास्त अकाउंट बंद केले आहे. केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला आपला अहवाल सादर करावा लागतो. यानुसार व्हॅाट्सॲपनं नुकताच ॲाक्टोबर महिन्याचा अहवाल सादर केलाय. त्यात ॲाक्टोबर महिन्यात 20 लाख 69 हजार व्हॅाट्सॲप अकाउंट बंद केल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. त्यामुळं केंद्र सरकारचे नवीन आयटी नियम आलेत. आता सोशल मीडियाचा जपून वापरा, असा सल्ला दिलाय सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी.

दर महिन्याला रिपोर्ट सादर करणे आवश्यक

व्हॅाट्सॲपनं 20 लाखांपेक्षा जास्त अकाउंट बंद केले आहे. केंद्र सरकारच्या नवीन आयटी नियमानुसार ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबूक अशा प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला प्रत्येक महिन्याला रिपोर्ट सादर करणे अनिवार्य केले आहेत. यानुसार समाजात द्वेष पसरवण्यासोबतच अश्लील संदेश आणि बदनामी करणाऱ्या अकाउंटवरही नजर ठेवली जाणार आहे. व्हॅाट्सॲपसोबतच इतर समाजमाध्यमंही अशीच कारवाई करणार आहेत. त्यामुळं जातीय द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेज सेंट करताना किंवा फॅारवर्ड करताना खबरदारी घ्यायची आहे. नाहीतर तुमचं सोशल मीडिया अकाउंट बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असं आवाहन सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे यांनी केलंय.

वापरकर्त्यांबाबत तक्रार आल्यास कारवाई

द्वेष पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर तीन टप्प्यांत कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला नोंदणी करताना तुमचा डेटा तपासला जातोय. त्यानंतर मॅसेज पाठवताना किंवा येणाऱ्या मॅसेजवर वॅाच ठेवला जातोय. आणि तिसरा टप्पा म्हणजे सोशल मीडिया वापरकर्त्यांबाबत तक्रार आल्यास ही कारवाई केली जात असल्यास सायबरतज्ज्ञ अजित पारसे सांगतात.

आयटी कायद्याचं पालन करणं गरजेचं

भारतात व्हॅाट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या 48 कोटी आहे. यापैकी काही जण व्हॅाट्सॲपचा वापर करताना अक्षरशः मोकाट सुटायचे. मनात येईल ते मॅसेज पाठवायचे. यातूनच अमरावती आणि नांदेडसारख्या घटना घडल्यात. पण आता नव्या आयटी कायद्याचं सर्व सोशल मीडिया कंपन्यांना पालन करणं गरजेचं आहे. याची सुरुवात व्हॅाट्सॲपने केलीय. द्वेषमूल मॅसेज पसरवणाऱ्यांचे अकाउंट कायमचे बंद केले. ही वेळ तुमच्यावर येणार नाही. याची दक्षता घेणं गरजेचं आहे.

Nagpur Crime वाढल्या होत्या घरफोड्या, पोलिसांसमोर होतं आव्हान, 3 गँगच्या मुसक्या आवळल्या

Nagpur Crime चोरी करायला आले, मार खाऊन गेले, वाचा कसा घडला थरार!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.