AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली बांधात उतरून रोवणी, कान्हादेवीचे शेतकरी झाले आश्चर्यचकित

भाताची रोवणी करण्यापूर्वी शेताची विशिष्ट पद्धतीने मशागत करणे आवश्यक असते. याला चिखलणी म्हणतात. पूर्वी बैलांच्या मदतीने हे चिखलणी करण्यात येत होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली बांधात उतरून रोवणी, कान्हादेवीचे शेतकरी झाले आश्चर्यचकित
| Updated on: Jul 23, 2023 | 10:35 PM
Share

नागपूर : जिल्ह्यामध्ये जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी आणि त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथ लांजेवार यांच्या शेतावर बेडवर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, पारशिवनीचे तालुका कृषी अधिकारी सुरज शेंडे, सरपंच छायाताई मधुकर नेवारे, पोलीस पाटील प्रेमल भोयर, प्रगतिशील शेतकरी श्रावण इडपाची, सूर्यभान राऊत, लक्ष्मण लांजेवार, हेमराज भुतांगे, पी. सी. झेलगोंदे, जे. बी. भालेराव, कृषी सहाय्यक आर. डी. सोरमारे उपस्थित होते.

ITANKAR 2 N

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः धानाच्या बांधीत उतरुन रोप लावणी केली. तसेच श्री. लांजेवार यांच्याकडील जतन करून ठेवलेले राळा, नाचणी, खपली गहू याबद्दल माहिती घेतली. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, फळबाग लागवडीची पाहणी केली.

ट्रॅक्टर चालवून चिखलणी केली

भाताची रोवणी करण्यापूर्वी शेताची विशिष्ट पद्धतीने मशागत करणे आवश्यक असते. याला चिखलणी म्हणतात. पूर्वी बैलांच्या मदतीने हे चिखलणी करण्यात येत होती. आता ट्रॅक्टरच्या मदतीने चिखलणी करण्यात येते. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून चिखलणी करण्याच्या प्रक्रियेत स्वतः सहभाग घेतला. यामुळे शेतकरी आश्चर्यचकित झाले.

श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन

नागपूर जिल्ह्यामध्ये भाताची रोवणी करताना श्री पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः धानाच्या बांध्यामध्ये उतरून लागवड केली. तसेच ट्रॅक्टर चालवून चिखलणी केली. जिल्हाधिकारी स्वतः शेताच्या बांधावर उतरल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा आनंद झाला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.