AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | धोकादायक विजेचा शॉक! गेल्या बत्तीस महिन्यांत 547 जणांना गमवावे लागले प्राण, किती जनावरांचा झाला मृत्यू?

जिवंत विद्युत प्रवाहाने धोका घडतो. यामुळं जीवही गमावले जातात. गेल्या बत्तीस महिन्यांत राज्यात पाचशेच्यावर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur | धोकादायक विजेचा शॉक! गेल्या बत्तीस महिन्यांत 547 जणांना गमवावे लागले प्राण, किती जनावरांचा झाला मृत्यू?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 4:00 AM
Share

नागपूर : विजेचा शॉक हा धोकादायकचं. विद्युत धक्क्याने प्राणहानी होण्याचे अनेक प्रकार समोर येतात. एप्रिल गेल्या 32 महिन्यांत राज्यभरात विजेचा शॉक (Statewide electric shock) लागून सुमारे 547 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. एक हजार 911 प्राण्यांचाही मृत्यू झाला. अशी माहिती ही माहिती अधिकारातून (From the right to information) समोर आलीय. नागपूर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महावितरणकडे (To MSEDCL) विचारणा केली होती. त्यांना वरील माहिती देण्यात आली. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत किती अपघात झाले. राज्यात विजेच्या धक्का लागून किती जणांचे बळी गेले. या दुर्घटनांमधील किती प्रकरणांत महावितरण जबाबदार होते. यापैकी किती जणांना आर्थिक सहकार्य मिळाले, हे सारे प्रश्न माहिती अधिकारातून विचारण्यात आले होते.

विदर्भातील अपघातांचे प्रमाण 32 टक्के

महावितरणकडून जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार, एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यभरात 547 नागरिकांच्या विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. एक हजार 911 प्राण्यांनाही याचा फटका बसला. या 32 महिन्यांच्या कालावधीत विजेच्या धक्क्यामुळे दोन हजार 657 प्राणांतिक अपघात झाले. या अपघातांपैकी 32.29 टक्के म्हणजेच 858 मृत्यू हे विदर्भातील होते.

तीन हजारांवर प्राण्यांचे अपघात

गेल्या बत्तीस महिन्यांच्या कालावधीत राज्यात तीन हजार 120 प्राण्यांचे प्राणांतिक अपघात झाले. त्यापैकी विदर्भातील एक हजार 183 प्राण्यांचा मृत्यू झाला. यातील 229 मृत व्यक्तींच्या वारसांना आठ कोटी 98 लाख रुपयांची मदत देण्यात आली. तसेच विद्युत धक्क्याने मृत्यू पावलेल्या 682 जनावरांच्या मालकांनाच आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी दोन कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक सहाय्यता मदत देण्यात आली आहे, अशी माहिती ही माहिती अधिकारातून मिळाली. अशाप्रकारचे अपघात टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी काही निधी राखीव ठेवणे गरजेचे आहे.

Nagpur Pollution | नांदगाव येथील राखेचे प्रदूषण कमी होणार काय?; आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक, टि्वटवरून दिली माहिती

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.