Nagpur | धोकादायक विजेचा शॉक! गेल्या बत्तीस महिन्यांत 547 जणांना गमवावे लागले प्राण, किती जनावरांचा झाला मृत्यू?

जिवंत विद्युत प्रवाहाने धोका घडतो. यामुळं जीवही गमावले जातात. गेल्या बत्तीस महिन्यांत राज्यात पाचशेच्यावर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur | धोकादायक विजेचा शॉक! गेल्या बत्तीस महिन्यांत 547 जणांना गमवावे लागले प्राण, किती जनावरांचा झाला मृत्यू?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 4:00 AM

नागपूर : विजेचा शॉक हा धोकादायकचं. विद्युत धक्क्याने प्राणहानी होण्याचे अनेक प्रकार समोर येतात. एप्रिल गेल्या 32 महिन्यांत राज्यभरात विजेचा शॉक (Statewide electric shock) लागून सुमारे 547 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. एक हजार 911 प्राण्यांचाही मृत्यू झाला. अशी माहिती ही माहिती अधिकारातून (From the right to information) समोर आलीय. नागपूर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महावितरणकडे (To MSEDCL) विचारणा केली होती. त्यांना वरील माहिती देण्यात आली. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत किती अपघात झाले. राज्यात विजेच्या धक्का लागून किती जणांचे बळी गेले. या दुर्घटनांमधील किती प्रकरणांत महावितरण जबाबदार होते. यापैकी किती जणांना आर्थिक सहकार्य मिळाले, हे सारे प्रश्न माहिती अधिकारातून विचारण्यात आले होते.

विदर्भातील अपघातांचे प्रमाण 32 टक्के

महावितरणकडून जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार, एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यभरात 547 नागरिकांच्या विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. एक हजार 911 प्राण्यांनाही याचा फटका बसला. या 32 महिन्यांच्या कालावधीत विजेच्या धक्क्यामुळे दोन हजार 657 प्राणांतिक अपघात झाले. या अपघातांपैकी 32.29 टक्के म्हणजेच 858 मृत्यू हे विदर्भातील होते.

तीन हजारांवर प्राण्यांचे अपघात

गेल्या बत्तीस महिन्यांच्या कालावधीत राज्यात तीन हजार 120 प्राण्यांचे प्राणांतिक अपघात झाले. त्यापैकी विदर्भातील एक हजार 183 प्राण्यांचा मृत्यू झाला. यातील 229 मृत व्यक्तींच्या वारसांना आठ कोटी 98 लाख रुपयांची मदत देण्यात आली. तसेच विद्युत धक्क्याने मृत्यू पावलेल्या 682 जनावरांच्या मालकांनाच आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी दोन कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक सहाय्यता मदत देण्यात आली आहे, अशी माहिती ही माहिती अधिकारातून मिळाली. अशाप्रकारचे अपघात टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी काही निधी राखीव ठेवणे गरजेचे आहे.

Nagpur Pollution | नांदगाव येथील राखेचे प्रदूषण कमी होणार काय?; आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक, टि्वटवरून दिली माहिती

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.