AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सीमाबांधवांवर लक्ष”; सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर ‘केंद्र’ अन्याय होऊ देणार नाही; या राजकीय नेत्याने भाजपचं गुणगान गायिले…

सीमावादावर राज्य सरकार गंभीर तर आहेच, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता बारकाव्याने याकडे लक्ष दिले असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सीमाबांधवांवर लक्ष; सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर 'केंद्र' अन्याय होऊ देणार नाही; या राजकीय नेत्याने भाजपचं गुणगान गायिले...
| Updated on: Dec 26, 2022 | 8:15 PM
Share

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासून विरोधकांनी सीमाप्रश्नावर जोरदार आवाज उठविणार असल्याचा इशारा सरकारला दिला होता. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज सीमावादा सवाल उपस्थित करूनही सरकारकडून दुर्लक्षे केले जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना आमदार रवी राणा यांच्याकडून सीमावादाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत. तर याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

आमदार रवी राणा यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी उद्धव ठाकरे हे बेळगावला सीमावादासाठी किती वेळा गेले माहिती नाही असा सवाल उपस्थित करून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरला आले आहेत ते काही सीमावादासाठी नाही तर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षिततेसाठी ते नागपूरात आल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.

आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविषयी मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमाबांधवांकडे बारकाव्याने लक्ष आहे.

सीमावाद सोडवण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही हा सीमावाद सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे तर, केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबरोबरच बेळगावातील कोणत्याही नागरिकांवर नाही असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक प्रशासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्र शासित करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी त्यांच्यावर टीका करत, उद्धव ठाकरे यांनी ही मागणी करणे चुकीचे असल्याचे मतही त्यानी यावेळी व्यक्त केले.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.