AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सीमाबांधवांवर लक्ष”; सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर ‘केंद्र’ अन्याय होऊ देणार नाही; या राजकीय नेत्याने भाजपचं गुणगान गायिले…

सीमावादावर राज्य सरकार गंभीर तर आहेच, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता बारकाव्याने याकडे लक्ष दिले असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सीमाबांधवांवर लक्ष; सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर 'केंद्र' अन्याय होऊ देणार नाही; या राजकीय नेत्याने भाजपचं गुणगान गायिले...
| Updated on: Dec 26, 2022 | 8:15 PM
Share

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासून विरोधकांनी सीमाप्रश्नावर जोरदार आवाज उठविणार असल्याचा इशारा सरकारला दिला होता. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज सीमावादा सवाल उपस्थित करूनही सरकारकडून दुर्लक्षे केले जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना आमदार रवी राणा यांच्याकडून सीमावादाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत. तर याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

आमदार रवी राणा यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी उद्धव ठाकरे हे बेळगावला सीमावादासाठी किती वेळा गेले माहिती नाही असा सवाल उपस्थित करून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरला आले आहेत ते काही सीमावादासाठी नाही तर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षिततेसाठी ते नागपूरात आल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.

आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविषयी मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमाबांधवांकडे बारकाव्याने लक्ष आहे.

सीमावाद सोडवण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही हा सीमावाद सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे तर, केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबरोबरच बेळगावातील कोणत्याही नागरिकांवर नाही असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक प्रशासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्र शासित करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी त्यांच्यावर टीका करत, उद्धव ठाकरे यांनी ही मागणी करणे चुकीचे असल्याचे मतही त्यानी यावेळी व्यक्त केले.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.