AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लव्ह जिहाद,आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, उपमुख्यमंत्र्यांनी सगळं चित्रच स्पष्ट केलं..

लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा केरळ राज्यात कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी या गोष्टीला लव्ह जिहाद हे नाव कसे दिले त्याचाही इतिहास त्यांनी यावेळी सांगितला.

लव्ह जिहाद,आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, उपमुख्यमंत्र्यांनी सगळं चित्रच स्पष्ट केलं..
Image Credit source: tv 9 Marathi
| Updated on: Dec 20, 2022 | 3:41 PM
Share

नागपूरः दिल्लीत श्रद्धा वालकर यांची हत्या झाल्यानंतर आंतरधर्मीय आणि लव्ह जिहादच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले होते. त्यातच आंतरधर्मीय विवाहाबाबत कायदा करण्यासंदर्भात सरकार विचार करत असल्याचे सांगितल्यानंतर विरोधकांनी त्याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी सरकारला धारेवर धरले होते.

त्यावरूनच आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी या कायद्याविषयी सवाल उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहाद आणि आंतर धर्मीय विवाहाविषयीच्या कायद्या करण्याविषयी सरकार काय विचार करत आहे त्याबाबतही त्यांनी स्पष्ट सांगितले.

लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, लव्ह जिहाद कायद्या संदर्भात काही राज्यांनी स्वतंत्र कायदे केले आहेत. हे कायदे करण्या पाठीमागे कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, कोणतीही महिला षडयंत्राला बळी पडता कामा नये यासाठी अशा कायद्यांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा केरळ राज्यात कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी या गोष्टीला लव्ह जिहाद हे नाव कसे दिले त्याचाही इतिहास त्यांनी यावेळी सांगितला.

त्यामुळे हा कायदा करत असताना कोणत्याही धर्माला अथवा व्यक्तीला विरोध म्हणून कायदा केला जात नाही तर कोणत्याही महिलांची षडयंत्र आखून त्यांची फसवणूक केली जाऊ नये यासाठी हा कायदा करण्याचा विचार सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लव्ह जिहादविषयी देशातील अनेक राज्यात कायदे करण्यात आले आहेत. त्या कायद्यांचा अभ्यास करून त्यासाठी वेगळा काही कायदा करण्याचा विचार करत आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.