AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | ऑटोरिक्षाच्या भाववाढीवरून चालक-ग्राहकांत मतभेद, मध्यम मार्ग निघणार कसा?

ऑटोरिक्षा मीटरने चालल्यास त्यांना नव्या बदलाचे लाभ मिळू शकतील. काळाप्रमाणे बदलणे हेही अशा संघटनांना आता जमायला हवे. ऑटो संघटनांनी आता टेक्नोसॅव्ही व्हावे. त्यातून त्यांना काही आशेची किरण दिसू शकतील असेही उपप्रादेशिक अधिकारी रवींद्र भुयार म्हणाले.

Nagpur | ऑटोरिक्षाच्या भाववाढीवरून चालक-ग्राहकांत मतभेद, मध्यम मार्ग निघणार कसा?
ग्राहक, ऑटो चालक संघटना आणि परिवहन प्रशासन यांची संयुक्त बैठक
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 5:38 PM
Share

नागपूर : ऑटोरिक्षाच्या भावावरून ऑटोरिक्षाचालक आणि ग्राहक संघटनांची बैठक झाली. यात भाववाढीवरून चालक-ग्राहक संघटनांत मतभेद असल्याचे दिसून आले. यातून मार्ग कसा काढायचा यावर उपप्रादेशिक अधिकारी रवींद्र भुयार यांनी काही उपाय सूचविले.

ऑटोरिक्षा मीटरने चालल्यास त्यांना नव्या बदलाचे लाभ मिळू शकतील. काळाप्रमाणे बदलणे हेही अशा संघटनांना आता जमायला हवे. ऑटो संघटनांनी आता टेक्नोसॅव्ही व्हावे. त्यातून त्यांना काही आशेची किरण दिसू शकतील असेही उपप्रादेशिक अधिकारी रवींद्र भुयार म्हणाले.

ऑटो दरात वाढीची गरज

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी ग्राहक, ऑटो चालक संघटना आणि परिवहन प्रशासन यांच्या संयुक्त बैठक घेतली. वाढीव इंधन दरामुळे सात वर्षापासून असलेल्या ऑटो दरात वाढीव महागाई प्रमाणे बदल होण्याची गरज आहे, असं ऑटो रिक्षा चालकांचे म्हणणे होतं. सुमारे सहा संघटनांनी या चर्चेत भाग घेतला होता. ग्राहक संघटनांचाही यात समावेश होता. ऑटो रिक्षा मीटरने चालतच नाही तर दरवाढीचा प्रश्न कुठे येतो, असे ग्राहकांचे म्हणणे होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पश्चिम विभाग संघटनमंत्री गजानन पांडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नागपूर जिल्ह्याचे संघटनमंत्री गणेश शिरोळे, श्री पांडे आणि इतरही ग्राहक संघटनांनी आपले विचार मांडले.

सुधारित नीती स्वीकारण्याची गरज

प्राप्त परिस्थितीत ऑटो रिक्षा चालकांना जीवन व्यापन करणे कठीण झाले असल्याचं ग्राहक संघटनांनीही मान्य केले. मात्र ऑटो रिक्षा मीटरने चालविल्यात तरच दरवाढीचा त्यांना लाभ होईल, असे ग्राहक संघटनांचे म्हणणे होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ऑटो संघटनांनी याचा अभ्यास वर्ग घेऊन ऑटो रिक्षा चालकांना नव्या स्पर्धात्मक काळाशी कसा लढा द्यावा याचा याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यादृष्टीने ओला उबेरसारखी सुधारित व्यवहार नीती स्वीकारण्याची गरज आहे, असे मत मांडले. यासाठी ग्राहक संघटनाही ऑटो रिक्षा संघटनांना सहकार्य देणे देण्यास तयार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पेट्रोल दरवाढीचा फटका

दरम्यान, ऑटो रिक्षा चालक संघटनांनी आपल्या अभ्यासपूर्ण मत बैठकीत व्यक्त केले. राज्य शासनाच्या हकिम समितीतर्फे 2014 मध्ये 14 रुपये टेरिफ दर प्रति किलो मीटर प्रमाणे देण्याचे सुचविले होते. त्यावेळी पेट्रोलचे दर 65 रुपये प्रति लिटर होते. आजच्या परिस्थितीत पूर्णतः बदल झाला आहे. आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ बघता ऑटोरिक्षाला प्रतिलिटर मागे एकशे पंचवीस रुपये खर्च येतो. अशा स्थितीत सात वर्षापूर्वीचे दर कायम ठेवणे हे आमच्यावर अन्यायकारक आहे अशा ऑटो संघटनांचे म्हणणे आहे.

Best from the Waste | घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती; किचन गार्डनसाठी मनपातर्फे प्रोत्साहन

Nagpur | धोकादायक ! पतंग पकडण्याचा नाद जीवावर बेतला, छतावर चढला नि खाली पडला

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.