चंद्रपूर : गेल्या आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या धानाचं नुकसान झालंय. वरच्या पावसामुळं हातात आलेले पीक गेलं. तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास राज्यांचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.