AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrasekhar Bawankule | ओबीसी आयोगाला गो स्लोचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य सरकारवर टीका

राज्य सरकारला सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत हा डेटा तयार करावा. राज्य सरकारला निवडणुका या ओबीसी आरक्षणशिवाय घ्यायच्या आहेत. त्यामुळे आयोग वेळ काढूपणा करत आहे. आयोगावर सरकारचं प्रेशर आहे, असंही ते म्हणाले.

Chandrasekhar Bawankule | ओबीसी आयोगाला गो स्लोचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य सरकारवर टीका
भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 3:29 PM
Share

नागपूर : भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आज पत्रकार परिषद घेतली. बावनकुळे म्हणाले, ओबीसी आरक्षण संदर्भाने राज्य सरकारने (State Government) ओबीसी आयोगाला गो स्लोचे (Go Slow) आदेश दिले. अहमदनगरमध्ये सूचना घेण्यासाठी सुरवात केली. राज्यात हे केलं जाणार आहे. हा वेळ काढूपणा आहे. आयोगाने वॉर्डप्रमाणे, गावाप्रमाणे यंत्रणा वापरून याचा डेटा तयार करायचा आहे. हा एक महिन्यात यंत्रणा वापरून केलं जाऊ शकते. मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) हे सगळं न करता सरळ डेटा तयार केला. मात्र महाराष्ट्रात ज्या प्रमाणे आयोग वागत आहे, त्यानुसार हे गो स्लोव सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्य सरकारनं कामाला लागावं, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला.

आयोगावर सरकारचा दबाव

राज्य सरकारला सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत हा डेटा तयार करावा. राज्य सरकारला निवडणुका या ओबीसी आरक्षणशिवाय घ्यायच्या आहेत. त्यामुळे आयोग वेळ काढूपणा करत आहे. आयोगावर सरकारचं प्रेशर आहे, असंही ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओबीसींबद्दल मंत्री सिरीयस नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपलं शिष्टमंडळ मध्य प्रदेशमध्ये पाठवायला पाहिजे होतं. जूनच्या पहिल्या आठवड्यात चंद्रकांत दादा शिष्टमंडळ बनविणार आहेत.

केंद्राप्रमाणे राज्याने इंधन दरवाढ कमी करावी

पेट्रोल -डिझेल दराबाबत ते म्हणाले, केंद्र सरकारने लोकांच्या भावना समजून पेट्रोल, डिझेलचे दर कमी केलेत. आता राज्य सरकारने 20 रुपये कमी करावे. मात्र हे सरकार करणार नाही. कारण हे वसुली सरकार आहे. त्यामुळे हे करणार नाही. यांना वसुलीमध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे हे दर कमी करत नाहीत, असा आरोपही बावनकुळे यांनी केलाय. फडणवीस सरकार असते तर सरळ 25 रुपये कमी केले असते, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.