AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कर्नाटक काय सोन्याची नगरी नाहीय, तिथं गेल्यावर काय सगळचं मिळणार असं नाही”; ‘या’ मंत्र्यांनी सीमावादावर थेट पडदाच पाडला….

ज्या कर्नाटकातील 865 गावांनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी संघर्ष केला आहे तरीही त्या गावांना अजून यश आले नाही. तर जतमधील गावांना लगेच कसं यश येणार असा सवालही सुरेश खाडे यांनी केला आहे.

कर्नाटक काय सोन्याची नगरी नाहीय, तिथं गेल्यावर काय सगळचं मिळणार असं नाही; 'या' मंत्र्यांनी सीमावादावर थेट पडदाच पाडला....
| Edited By: | Updated on: Dec 27, 2022 | 5:11 PM
Share

नागपूरः महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी ठराव पास केल्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह त्यांनी विरोधकांचेही अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची सीमाप्रश्नी काय भूमिका आहे हे ही सुरेश खाडे यांनी आज स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी म्हैसाळ योजना आता कशा पद्धतीने अंमलात आणली जाणार आहे त्याचीही माहिती त्यांनी सांगितली.

ज्या सांगलीतील जत तालुक्यामधील 40 गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाला कळवल्यानंतर त्या गावांबरोबर चर्चा करून त्यांना सोयीसुविधा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

त्यामुळे ज्या कर्नाटकातील 865 गावांनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी संघर्ष केला आहे तरीही त्या गावांना अजून यश आले नाही.

त्यामुळे जत तालुक्यातील ज्या गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला होता, तो काही एक दोन दिवसामध्ये लगेच मंजूर केला जाणार नाही. आणि कर्नाटक काय सोन्याची नगरी नाहीय, तिथं गेल्यावर काय सगळच मिळणार असंही नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

जत तालुका नेहमीच दुष्काळग्रस्त राहिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पाण्यासाठी वेगवेघगळ्या योजना राबवण्याचं काम जाते आहे. जत तालुक्याला दुष्काळाची मोठी झळ बसत असल्याने 2 हजार कोटीची पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे.

त्यामुळे ही गावं कर्नाटकात जाण्याचा तर प्रश्न आता येणार नाही. तरीही दुष्काळ पट्ट्यातील गावांसाठी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यात राबवण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.