AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं

नागपुरात घरगुती वादाचा शेवटी अतिशय वाईट झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पती-पत्नीचा वाद झाला. या वादात पत्नी घर सोडून निघून गेली. त्यामुळं दुःखी झालेल्या पतीने अतिशय टोकाचा निर्णय घेतला.

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं
नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने आत्महत्या केली. Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 16, 2022 | 9:34 AM
Share

नागपूर : कुटुंब म्हटलं तर वाद होतच असतात. अशाच प्रकारचा वाद हुडकेश्वर पोलीस (Hudkeshwar police) ठाण्याच्या हद्दीत झाला. नीलेश ठाकूर (Nilesh Thakur) यांचे पत्नीशी भांडण झाले. नेहमीच दोघांचे खटके उडत होते. त्यामुळं पत्नीने घर सोडण्याचा निर्णय (wife decides to leave home) घेतला. ती घराबाहेर निघून गेली. त्यामुळं नीलेशला अतिशय वाईट वाटले. तो चिंता करू लागला. आता घर पत्नीअभावी त्याचं मन रमेना त्यामुळं तो निराशेत होता. अशात त्याच्या मनात आत्महत्येचा विचार डोकाऊ लागला. त्याने विषाची व्यवस्था केली. ते विष घेतले. विषबाधा झाल्याने नीलेशचा मृत्यू झाला.

अशी घडली घटना

मृतक नीलेशचा पत्नीशी वाद झाला. या वादात दोघेही चांगलेच भांडले. नेहमीच्या या भांडणामुळं त्याची पत्नीही त्रस्त झाली होती. ती आधी त्याला सोडून जाण्याची धमकी द्यायची. या भांडणानंतर खरोखरचं ती नीलेशला सोडून गेली. या घटनेमुळं नीलेशला अतिशय दुःख झाले. त्यामुळं त्याने जीवनाचा शेवट करायचा कठोर निर्णय घेतला. विष कुठूनतरी आणले. मन कठोर करून ते घेतली. हळूहळू विष त्याच्या शरीरात भिनले. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.

सुखी संसाराची राखरांगोळी

या घटनेमुळं नागपूर हादरलेय. सुखी संसाराची राखरांगोळी कशी होऊ शकते, हे घटनेतून दिसून आले. त्यामुळं संसार सांभाळताना दोघांनाही काहीतरी तडजोड करावी लागते. ती केली नाही, तर अशाप्रकारे सुखी संसाराची राखरांगोळी होते.

महिलेचा विनयभंग

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक घटना घडली. अठ्ठावीस वर्षीय महिला ऑटोने प्रवास करत होती. मिलिंद मलकाम या ऑटोचालकाने ऑटोत बसल्यावर विनयभंग केला, अशी तक्रार ठाण्यात नोंदविली. सोमवारी संध्याकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली असं संबंधित महिलेचं म्हणणं आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण केव्हा जाहीर होणार? कार्यकाळ संपत असल्याने उत्सुकता शिगेला

चंद्रपुरात रामदेवबाबा सालव्हंट कंपनीमुळे प्रदूषण? MPCB च्या मानकानुसार यंत्रणा बसवल्याची कंपनीची स्पष्टोक्ती

चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वाद, प्राध्यापक-व्यवस्थापन आमनेसामने, काय आहे प्रकरण?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली