AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ईडी असो सीबीआय असो, ही कारवाई कुणाच्या सांगण्यावरून होतेय, हे जगाला माहितीय”; ‘या’ नेत्याचा नेमका निशाणा कोणावर?

महाविकास आघाडीतील नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप करून ईडी आणि सीबीआयकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

ईडी असो सीबीआय असो, ही कारवाई कुणाच्या सांगण्यावरून होतेय, हे जगाला माहितीय; 'या' नेत्याचा नेमका निशाणा कोणावर?
| Updated on: Dec 27, 2022 | 6:35 PM
Share

नागपूरः आमदार अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सीबीआयने न्यायालयात स्टे अर्ज दाखल केला होता. सीबीआयचा तो अर्ज न्यायालयाने नाकारल्यामुळे आता अनिल देशमुख यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार अनिल देशमुख आता बाहेर येणार असल्यामुळे महाविकास आघाडीतील सगळेच नेते मंडळी आनंदी असल्याचे मत आमदार सुनील राऊत यांनी व्यक्त केले आहे. ईडी, सीबीआयच्या कारवाईमुळे आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना तुरुंगात राहण्याची वेळ आली आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईमध्ये आणि ज्या नेत्यांवर आरोप लावले गेले आहेत, ते सिद्ध झाले नाहीत.

त्यामुळे आता सीबीआय आणि ईडीचे अर्जही न्यायालयाकडून फेटाळले जात आहेत. त्यावरून ही कारवाई कोणाच्या आदेशावरून केली जाते हे लक्षात येते असा टोला सुनील राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला आहे.

महाविकास आघाडीतील नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप करून ईडी आणि सीबीआयकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मात्र या कारवाईला कोणत्याही सत्याचा आधार नव्हता. सरकारविरोधात जे लोकं बोलतील त्यांना अटक करा असेच वर्तन हे सरकार करत असल्याची टीका सुनील राऊत यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकारविरोधात बोलले की, त्यांच्यावर कारवाई होते, त्या नेत्यांना अटक केली जाते. त्यामुळे ही कारवाई केली जात असली तरी ती कारवाई कोणाच्या सांगण्यावरून होते हे आता सगळ्यांना माहिती आहे म्हणत आमदार सुनील राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Follow Us
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....