AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कचरा संकलनासाठी QR कोड, नागपूर महापालिकेकडून प्रायोगिक तत्वावर सुरुवात, राज्यातील पहिला प्रयोग

महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात महापालिकेनं कचरा संकलनासाठी QR कोड ची पद्धत सुरु केलीय. प्रायोगिक तत्त्वावर 10 घरात ही पद्धती सुरु करण्यात आल्याचं महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितलंय.

कचरा संकलनासाठी QR कोड, नागपूर महापालिकेकडून प्रायोगिक तत्वावर सुरुवात, राज्यातील पहिला प्रयोग
क्यू आर कोड
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 05, 2021 | 1:29 PM
Share

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात महापालिकेनं कचरा संकलनासाठी QR कोड ची पद्धत सुरु केलीय. प्रायोगिक तत्त्वावर 10 घरात ही पद्धती सुरु करण्यात आल्याचं महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितलंय. नागपूर महापालिकेचा हा प्रयोग यशस्वी होणार का हे पाहावं लागणार आहे.

नागपूर महानगरपालिकेकडून घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सोय करण्यात आलीय. पण गेल्या काही दिवसांत कचऱ्याची गाडी वेळेवर आणि नियमित येत नसल्याची अनेकांची तक्रार होती, यावर समाधान शोधण्यासाठी मनपाने प्रायोगिक तत्त्वावर क्यु आर कोड पद्धती सुरु करण्यात आलीय.

क्यूआर कोडची प्रक्रिया कशी चालणार?

कचरा संकलनासाठी आलेल्या गाडीचा चालक त्या घरातील QR कोड स्कॅन करणार, आणि त्यानंतर कुठल्या घरातून कचरा संकलन झाले, याची माहिती महानगरपालिका प्रशासनाला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 10 घरात याची सुरुवात झालीय. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचं यावेळी महापौर दयाशंक तिवारी यांनी सांगितले. प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेल्या या प्रयोगाला यश आल्यास संपूर्ण नागपूरमध्ये हा प्रयोग राबवला जाण्याची शक्यता आहे.

नागपूरकरांनी ई-चालानचा दंड थकवला

नागपुरात नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॅाच आहे. नियम तोडणाऱ्या वाहणांचे फोटो सीसीटीव्हीत कैद झाले की लगेच वाहनचालकांच्या मोबाईलवर ई चालान पाठवाला जातो. पण नागपूर पोलिसांच्या या ई चालानला साधारण दीड लाख पेक्षा जास्त वाहनचालकांनी केराची टोपली दाखवलीय.

30 टक्के वाहनचालकांनी ई चालानचं शुल्क थकवलं

नागपूर शहरात साधारण ३० टक्के ई चालान भरलेच नाही. ई चालानची थकीत रक्कम सात कोटींच्या आसपास आहे. थकीत दंड वसूल करण्यासाठी आणि बेलगाम वाहनचालकांवर कारवाईसाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी स्मार्ट नाकाबंदी लावलीय. या स्मार्ट नाकाबंदीतून पाच महिन्यात 5 कोटी 70 लांकांचा दंड वसूल झालाय. पण अद्याप साधारण 30 टक्के वाहनचालकांनी ई चालान भरलाच नाही. त्यामुळे बेलगाम वाहनचालकांना ई चालानचा धाक नाही का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

इतर बातम्या:

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल

वाहतूक पोलिसांच्या ई- चालानचा धाक कमी? दीड लाख वाहनचालकांनी दंड थकवला

Nagpur Municipal Corporation launched QR code scanning system for waster collection said by Dayashankar Tiwari

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक