AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल

ओबीसींच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ( OBC Reservation)

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल
babanrao taywade
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 10:58 AM
Share

नागपूर: ओबीसींच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 वसतिगृह बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तीन वर्षे झाली. या आश्वासनाचं काय झालं? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हा सवाल केला. ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे. 2018 मध्ये ओबीसींसाठी 36 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी यांनी या वसतिगृहाची घोषणा केली होती. मात्र, तीन वर्षे होत आले तरी वसतिगृहासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. वसतिगृहाची घोषणा हवेतच विरली आहे. या आश्वासनाचं काय झालं?, असा सवाल तायवाडे यांनी केला आहे.

मराठा समाजाचे वसतिगृह होते, ओबीसींचे का नाही?

ओबीसी विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे. एका महिन्यात ओबीसींचे वसतिगृह बांधण्यास सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तायवाडे यांनी दिला आहे. राज्य सरकार ओबीसींच्या बाबतीत फक्त आश्वासनं देतं. काम काही करत नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह तयार झालेत, मग ओबीसींचे का नाही?, असा सवालही त्यांनी केला.

दोन वर्षात ओबीसी हिताचा निर्णय नाही

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत ओबीसी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. दोन वर्षांत ओबीसी समाजाला सरकारकडून काहीही मिळालं नाही, वसतिगृहाचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय केवळ कागदावरच राहिला आहे, असं ते म्हणाले. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

संबंधित बातम्या:

‘आम्हाला सांगा, 4 महिन्यात इम्पिरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत करु, नाही तर पदावर राहणार नाही’, फडणवीसांचं जाहीर चॅलेंज

ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, ‘नरेंद्र’ यांच्या हातावर ‘देवेन्द्र’ टॅटू

VIDEO: शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू

(rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.