AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल

ओबीसींच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ( OBC Reservation)

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल
babanrao taywade
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 10:58 AM
Share

नागपूर: ओबीसींच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 वसतिगृह बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तीन वर्षे झाली. या आश्वासनाचं काय झालं? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हा सवाल केला. ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे. 2018 मध्ये ओबीसींसाठी 36 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी यांनी या वसतिगृहाची घोषणा केली होती. मात्र, तीन वर्षे होत आले तरी वसतिगृहासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. वसतिगृहाची घोषणा हवेतच विरली आहे. या आश्वासनाचं काय झालं?, असा सवाल तायवाडे यांनी केला आहे.

मराठा समाजाचे वसतिगृह होते, ओबीसींचे का नाही?

ओबीसी विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे. एका महिन्यात ओबीसींचे वसतिगृह बांधण्यास सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तायवाडे यांनी दिला आहे. राज्य सरकार ओबीसींच्या बाबतीत फक्त आश्वासनं देतं. काम काही करत नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह तयार झालेत, मग ओबीसींचे का नाही?, असा सवालही त्यांनी केला.

दोन वर्षात ओबीसी हिताचा निर्णय नाही

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत ओबीसी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. दोन वर्षांत ओबीसी समाजाला सरकारकडून काहीही मिळालं नाही, वसतिगृहाचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय केवळ कागदावरच राहिला आहे, असं ते म्हणाले. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

संबंधित बातम्या:

‘आम्हाला सांगा, 4 महिन्यात इम्पिरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत करु, नाही तर पदावर राहणार नाही’, फडणवीसांचं जाहीर चॅलेंज

ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, ‘नरेंद्र’ यांच्या हातावर ‘देवेन्द्र’ टॅटू

VIDEO: शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू

(rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.